AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप सोसलं, आता शुक्र दाखवणार चांगले दिवस; या राशींच्या लोकांना लागणार मोठा जॅकपॉट

शुक्र ग्रह 20 जुलैला रविवारी मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, आणि याच दिवशी राहू व केतुचं देखील नक्षत्र परिवर्तन होणार आहे. हा काळ चार राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

खूप सोसलं, आता शुक्र दाखवणार चांगले दिवस; या राशींच्या लोकांना लागणार मोठा जॅकपॉट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 1:37 PM
Share

शुक्र ग्रह 20 जुलैला रविवारी मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, आणि याच दिवशी राहू व केतुचं देखील नक्षत्र परिवर्तन होणार आहे. शुक्र ग्रह रविवारी दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचे स्वामी ग्रहांचे सेनापती मंगळ आहे. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनानंतर काही दिवसांमध्येच 26 जुलैला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. बुध वृषभ राशीमधून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह भौतिक सुख सुविधा, समृद्धी, सुख, दाम्पत्य जीवन, ऐश्वर्य, आनंद आणि सुंदरताचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जेव्हा शुक्र आपली चाल बदलतो त्या घटनेला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व असंत, शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा बाराही राशींवर परिणाम होणार आहे. शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे? हे जाणून घेऊयात.

मिथुन रास – शुक्रानं मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करताच या राशींच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. मिथुन राशींच्या लोकांना नवे कपडे आणि दागिने प्राप्त होण्याचा योग आहे. तसेच या काळात त्यांना कुटुंबाची पूर्ण साथ मिळणार आहे.शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होणार असून, उत्पन्नाचा एखादा नवीन स्त्रोत देखील प्राप्त होऊ शकतो, अनेक दिवसांपासून सरकार दरबारी अडकलेलं एखादं काम या काळात पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे.

सिंह रास – शुक्राचं नक्षत्र परिवर्तन होताच सिंह राशींच्या लोकांना आनंदाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. सिंह राशींच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. कुटुंबांची साथ मिळेल. नशीबाचीही शंभर टक्के साथ या काळात मिळणार आहे. विवाह इच्छूक तरुणांसाठी या काळात अनुकूल वातावरण राहणार आहे. जर तुम्ही एखादा नवा बिझनेस सुरु करू इच्छित असाल तर हा बिझनेस भविष्यात तुम्हाला खूप फायद्याचा ठरू शकतो, शुक्र राशीच्या नक्षत्र परिवर्तनानंतर सिंह राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत.

तूळ रास – शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याचा योग आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांना कुटुंबाची आणि जवळच्या व्यक्तींची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुम्ही भविष्यातील काही योजना आखू शकता, त्या पद्धतीनं नियोजन करू शकता.

वृश्चिक रास – या राशीच्या लोकांना देखील शुक्राचं हे नक्षत्र परिवर्तन मोठं फायद्याचं ठरणार आहे. कुटुंबात एखादं शुभ कार्य ठरू शकतं, तसेच अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं काम या काळात पूर्ण होऊ शकतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.