AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

solar eclipse 2023 : सूर्यग्रहणामुळे पाच राशींच्या जीवनावर होणार परिणाम, काय सांगतं ज्योतिषशास्त्र वाचा

ज्योतिषशास्त्रात ग्रह ताऱ्यांसोबत अमावास्या, पौर्णिमा, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांना खूप महत्त्व आहे. या खगोलीय घटना राशीचक्रावर परिणाम करतात. त्यामुळे या घटनांकडे ज्योतिषांचं बारीक लक्ष असतं.

solar eclipse 2023 : सूर्यग्रहणामुळे पाच राशींच्या जीवनावर होणार परिणाम, काय सांगतं ज्योतिषशास्त्र वाचा
solar eclipse 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण एप्रिलमध्ये, या पाच राशींचं टेन्शन वाढणार
| Updated on: Apr 04, 2023 | 12:41 PM
Share

मुंबई – ज्योतिषशास्त्र आणि अवकाशातील ग्रह तारे यांचं घट्ट नातं आहे. एखादी खगोलीय घटना घडत असताना त्यावरून भाकीतं वर्तवली जातात. खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना खास असणार आहे. या महिन्यात ग्रहांची उलथापालथ, त्याचबरोबर शुभ-अशुभ युतींची सांगड दिसणार आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येईल. त्यात या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असून मेष राशीत असणार आहे.

चंद्र पृथ्वीपासून लांब पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध येते तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होतं.20 एप्रिलला असणारं सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ मान्य नसेल. पण त्याचा काही राशींवर परिणाम होईल. सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणात अवधी 5 तास 24 मिनिटं इतका असेल.

सूर्यग्रहणाचा या राशींवर होणार परिणाम

मेष – सूर्यग्रहण या राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांवार शारीरिक, मानसिक परिणाम दिसून येईल. या काळात आर्थिक अडचण प्रकर्षाने जाणवून येईल. पण गरज नसताना एखाद्याकडून पैशांची उसणवारी करू नका. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतं. एखादं सोपं काम करण्यासाठी तुम्हाला खूपच मेहनत करावी लागू शकते.

वृषभ – या राशीच्या बाराव्या स्थानात सूर्यग्रहण होणार आहे. या स्थानाला व्यय स्थान बोललं जातं. कर्ज, नुकसान, विदेशवारी, व्यसन,तुरुंगवास, गुप्त शत्रू याबाबत हे स्थान निगडीत आहे. त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवा. कारण एखादी चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्याने खर्चात वाढ होईल.

कन्या – या राशीच्या आठव्या स्थानात सूर्यग्रहण होणार आहे. या स्थानाला मृत्यू स्थान म्हटलं जातं. दुख आणि आर्थिक स्थितीबाबत सांगणार स्थान आहे. विनाकारण एखादा कौटुंबिक वाद उफाळून येईल. त्यामुळे घरी तणावपूर्ण स्थिती राहील. त्यामुळे प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या जातकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण एखादा जुना आजार त्रास देऊ शकतो.

मकर – या राशीच्या चौथ्या स्थानात सूर्यग्रहण होणार आहे. या स्थानातून मातृसुख, गृह सौख्य, मित्र आणि पोटाच्या आजारासंदर्भात माहिती मिळते. या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरी किंवा मित्रांसोबत काही कारणांमुळे वाद होऊ शकतो. पोटासंदर्भात आजाराची काळजी घ्या. शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा.

मीन – ज्योतिषशास्त्रात द्वितीय स्थानाला धन स्थान बोललं जातं. व्यक्तीची आर्थिक स्थिती, कुटुंब सुख आणि घराच्या स्थितीबाबत माहिती मिळेस. या राशीच्या दुसऱ्या स्थानात सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळ आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एखादी गुंतवणूक करताना काळजी घ्या. मोठी गुंतवणूक करणं या काळात टाळा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.