AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : अंथरूणावर बसून जेवल्याने निर्माण होतो वास्तूदोष, या समस्यांचा करावा लागतो सामना

तुमच्या दैनंदिन दिनचर्येचे चांगले वेळापत्रक तुम्हाला चांगले आरोग्यदायी जीवन देते आणि तुमच्या घरातील वास्तूवरही (Vastu Tips) मोठा प्रभाव दाखवते. वास्तुशास्त्रात दैनंदिन दिनचर्येबाबत काही टिप्स देण्यात आल्या आहेत आणि काही गोष्टींना प्रतिबंधही करण्यात आले आहे.

Vastu Tips : अंथरूणावर बसून जेवल्याने निर्माण होतो वास्तूदोष, या समस्यांचा करावा लागतो सामना
वास्तू टिप्स Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 18, 2023 | 3:44 PM
Share

मुंबई : आपल्या दैनंदिन सवयींचा आपल्या नशिबावर खोलवर प्रभाव पडतो असे शास्त्रात सांगितले आहे. आपली रोजची दिनचर्या कठोर परिश्रम आणि नशिबाची दिशा ठरवते. मुलं लहान असताना त्यांच्या सवयींबद्दल काही गोष्टी शाळेत आणि घरात शिकवल्या जातात. तुमच्या दैनंदिन दिनचर्येचे चांगले वेळापत्रक तुम्हाला चांगले आरोग्यदायी जीवन देते आणि तुमच्या घरातील वास्तूवरही (Vastu Tips) मोठा प्रभाव दाखवते. वास्तुशास्त्रात दैनंदिन दिनचर्येबाबत काही टिप्स देण्यात आल्या आहेत आणि काही गोष्टींना प्रतिबंधही करण्यात आले आहे. अनेकदा तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांकडून ऐकले असेल की, आपण बेडवर बसून जेवू नये. वास्तुशास्त्रातही असे करण्यास मनाई का आहे वास्तू शास्त्रज्ञ हरिदास पुरोहित यांच्याकडून जाणून घेऊया.

अंथरुणावर का जेवू नये

1. वास्तुशास्त्र तज्ञांचे म्हणणे आहे की सकाळी जेवण्यासाठी सर्वात चांगली जागा म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरात जमिनीवर बसून जेवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय स्वयंपाकघरात बसून जेवल्याने राहु प्रसन्न राहतो. स्वयंपाकघर व्यतिरिक्त, कोणीही त्याच्या आसपासच्या भागात खाण्यासाठी निवडू शकतो.

2. अनेकांना अंथरूणावर बसून जेवण्याची सवय असते. वास्तुशास्त्रात हे निषिद्ध आहे. असे म्हटले जाते की अंथरुणावर बसून जेवल्याने शरीर आणि मन दोन्हीवर वाईट परिणाम होतात. पलंगावर बसून जेवण केल्याने घरात कलह वाढतो आणि घरातील सुख-शांती नष्ट होते. अंथरुणावर जेवण केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो.

3. याशिवाय अशी आणखी दोन कामे आहेत जी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून चांगली मानली जात नाहीत. उदाहरणार्थ, आपण स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्यास आणि स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्यास, आर्थिक समस्या निर्माण होतात. याशिवाय घराच्या मुख्य दारासमोर कचरा ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही.

स्वयंपाकघर कोणत्या दिशेने असावे?

घराचे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला म्हणजेच अग्नीच्या कोनात असणे उत्तम मानले जाते. स्वयंपाकघर अशा ठिकाणी असावे जेथे स्वयंपाकघरातील स्टोव्ह मुख्य दरवाजाच्या बाहेरून दिसत नाही. स्वयंपाक करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असावे. ही दिशा ग्रहांचा राजा सूर्याची दिशा मानली जाते.

स्लॅब कोणत्या दिशेने असावा?

स्वयंपाकघरात स्लॅब किंवा भांडी ठेवण्यासाठी कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेला बनवावे. स्वयंपाकघरात वापरलेले मसाले आणि खाद्यपदार्थ उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावेत. स्वयंपाकघरातील स्कायलाइट किंवा खिडक्या मोठ्या असाव्यात हे लक्षात ठेवा.

स्वयंपाकघरात अशाच गोष्टी ठेवा

मायक्रोवेव्ह, मिक्सर इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही आग्नेय कोपर्यात ठेवू शकता. याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवा. कोणतीही हलकी वस्तू स्वयंपाकघरात पूर्व आणि उत्तर दिशेला ठेवावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...