AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरातून ‘या’ गोष्टी ताबडतोब काढून टाका, अन्यथा वाढू शकतात समस्या

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरासाठी अनेक नियम सांगितले आहेत जे पाळल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी स्वयंपाकघरात ठेऊ नयेत. चला जाणून घेऊया याबद्दल.

स्वयंपाकघरातून 'या' गोष्टी ताबडतोब काढून टाका, अन्यथा वाढू शकतात समस्या
kitchen
| Edited By: | Updated on: Sep 14, 2025 | 8:00 PM
Share

स्वयंपाकघर हा घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हिंदू धर्मात स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवी वास करत असते असे मानले जाते. स्वयंपाकघरात आपण अनेक प्रकारचे चविष्‍ट पदार्थ बनवले जातात. तर हे अन्न आपल्याला शरीरासोबतच आपल्या आत्म्याचेही पोषण करते, म्हणून वास्तूशास्त्र स्वयंपाकघराची दिशा काही गोष्टींचे स्थान तसेच तेथील स्वच्छतेचे विशेष भर देण्यात येते. अशातच वास्तुशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या स्वयंपाकघरात ठेवू नयेत. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात गरिबी राहते. तसेच स्वयंपाकघरात या गोष्टी ठेवल्याने तुम्हाला वास्तुदोषाचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळेस तुम्ही घरातून या गोष्टी ताबडतोब काढून टाकाव्यात.

अशी भांडी ताबडतोब फेकून द्या

तुटलेली किंवा चिर गेलेली भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नयेत, कारण वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्याने घरात गरिबी येते. अशा वेळेस अशी भांडी ताबडतोब घरातून बाहेर फेकून द्यावीत.

अशा गोष्टी काढून टाका

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात खराब झालेले मिक्सर, ओव्हन व इतर कोणतेही इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नयेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळेस ही उपकरणे दुरुस्त करावीत किंवा घराबाहेर काढून टाकावीत.

अडचणी वाढू शकतात

अनेकांना शिळे अन्न स्वयंपाकघरात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची सवय असते. परंतु वास्तुशास्त्रात असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते. यामुळे तुम्हाला आजार आणि तणाव इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

या गोष्टी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात कधीही आरसा ठेवू नये, कारण त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. यासोबतच स्वयंपाकघरात वापरलेले झाडू किंवा कपडे देखील स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे तुम्हाला नकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात. झाडू नेहमी अशा प्रकारे ठेवा की कोणाचीही नजर त्यावर पडणार नाही. तसेच स्वयंपाकघरात वापरलेले कपडे स्वच्छ ठेवा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.