AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जातात.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर 'या' चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 10, 2021 | 9:48 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जातात. त्यांची धोरणे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीति ग्रंथात जीवनाच्या यशाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. या धोरणांचे अनुसरण करुन, एखादी व्यक्ती आपल्या जीवनाचे लक्ष्य प्राप्त करु शकते (Acharya Chanakya Said These Four Things Are Very Important In Life For Success In Chanakya Niti).

जर तुम्हाला आयुष्यात यश मिळत नसेल, तर चाणक्य नीतिमध्ये याबाबच सांगण्यात आले आहे. ज्याचा अवलंब करुन तुम्ही यश मिळवू शकता. चाणक्यच्या सहाव्या अध्यायातील एका श्लोकात त्याचे वर्णन आहे.

प्रभूंतकार्यनल्पंवातन्नरछ कर्तुमिच्छति| सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकप्रचक्षते||

नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे लक्ष्य सिंहासारखे असले पाहिजे. ज्याप्रमाणे सिंह आपल्या शिकारावर लक्ष ठेवतो आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संधी साधतो. त्याचप्रमाणे, त्या व्यक्तीचे लक्षदेखील त्याच्या ध्येयाकडे असले पाहिजे.

प्रामाणिकपणे कार्य करा

आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही कामात यश हे काम आपण किती कष्टाने आणि प्रामाणिकपणे केले यावर अवलंबून असते. काम लहान असो की मोठे, ते काम पूर्ण प्रामाणिकपणाने केले पाहिजे.

एकाग्रता

चाणक्य नीतिनुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात यश मिळेल की नाही हे त्याच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. यश मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे त्याचा मार्ग सुलभ होतो.

स्वतःवर विश्वास ठेवा

यशाचा मार्ग मिळविण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक असते. या कठीण मार्गाने व्यक्तीला त्याची इच्छाशक्ती स्थिर ठेवावी लागते. कारण काही वेळाने हिंम्मत कमी होऊ लागते. शेवटपर्यंत स्वत:वर विश्वास ठेवणारी व्यक्ती जीवनात यश मिळविण्यास सक्षम असते.

Acharya Chanakya Said These Four Things Are Very Important In Life For Success In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?