AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर ‘या’ चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जातात.

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर 'या' चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti
| Updated on: May 10, 2021 | 9:48 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जातात. त्यांची धोरणे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांच्या नीति ग्रंथात जीवनाच्या यशाबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. या धोरणांचे अनुसरण करुन, एखादी व्यक्ती आपल्या जीवनाचे लक्ष्य प्राप्त करु शकते (Acharya Chanakya Said These Four Things Are Very Important In Life For Success In Chanakya Niti).

जर तुम्हाला आयुष्यात यश मिळत नसेल, तर चाणक्य नीतिमध्ये याबाबच सांगण्यात आले आहे. ज्याचा अवलंब करुन तुम्ही यश मिळवू शकता. चाणक्यच्या सहाव्या अध्यायातील एका श्लोकात त्याचे वर्णन आहे.

प्रभूंतकार्यनल्पंवातन्नरछ कर्तुमिच्छति| सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकप्रचक्षते||

नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे लक्ष्य सिंहासारखे असले पाहिजे. ज्याप्रमाणे सिंह आपल्या शिकारावर लक्ष ठेवतो आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संधी साधतो. त्याचप्रमाणे, त्या व्यक्तीचे लक्षदेखील त्याच्या ध्येयाकडे असले पाहिजे.

प्रामाणिकपणे कार्य करा

आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही कामात यश हे काम आपण किती कष्टाने आणि प्रामाणिकपणे केले यावर अवलंबून असते. काम लहान असो की मोठे, ते काम पूर्ण प्रामाणिकपणाने केले पाहिजे.

एकाग्रता

चाणक्य नीतिनुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात यश मिळेल की नाही हे त्याच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. यश मिळविण्यासाठी एखाद्या व्यक्तीने त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे त्याचा मार्ग सुलभ होतो.

स्वतःवर विश्वास ठेवा

यशाचा मार्ग मिळविण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक असते. या कठीण मार्गाने व्यक्तीला त्याची इच्छाशक्ती स्थिर ठेवावी लागते. कारण काही वेळाने हिंम्मत कमी होऊ लागते. शेवटपर्यंत स्वत:वर विश्वास ठेवणारी व्यक्ती जीवनात यश मिळविण्यास सक्षम असते.

Acharya Chanakya Said These Four Things Are Very Important In Life For Success In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद.....
सरकार गुंडागर्दी करून घर पाडू शकते, पुन्हा घर बांधण्याची ताकद......
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन...
अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन....
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल
मोठी बातमी! सोनिया गांधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, मेदांता हॉस्पिटल.