AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | कधीही आपल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाशीही बोलू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितले कारण

आयुष्यात यशस्वी व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असतं. यश मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचे असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

Chanakya Niti | कधीही आपल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाशीही बोलू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितले कारण
Chanakya
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई : आयुष्यात यशस्वी व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असतं. यश मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचे असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात ही खऱ्या उतरतात. अनेक वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यांनी लिहिलेली नीतिशास्त्र आजही लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवून जाते.

आचार्य चाणक्य यांनी व्यवसायापासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अतिशय अचूक आणि सविस्तर गोष्टी नीतिशास्त्रात मांडल्या आहेत. आयुष्य जगताना आपण खूप चुका करतो. आणि बऱ्याच चुका माणसं ओळखता न आल्यामुळे होतात. त्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवताना आपण चाणक्यनीतील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

चाणक्य नीतीशास्त्रामध्ये सांगितात की जेव्हा दोन ज्ञानी लोक एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्या संवादातून कोणीही अचानक मधूनबाहेर पडू नये, कारण जेव्हा दोन ज्ञानी लोक भेटतात तेव्हा ते ज्ञानाच्या अनेक चांगल्या गोष्टी करतात. त्यातून अनेक कल्पना जन्माला येत असतात.

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या ठिकाणी पती-पत्नीच्या कोणत्याही वादामध्ये तिसऱ्या व्यक्तीने येऊ नये. त्यामुळे पती पत्नीचे नाते खराब होते.

चाणक्य नीतीनुसार, ज्ञानी माणूस कधीही त्याच्या आर्थिक अडचणींवर चर्चा करत नाही. अशा व्यक्ती आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधतात,

आचार्य चाणक्यांच्या मते, तुमच्या सर्वात मोठ्या योजना नेहमी स्वत: जवळ ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या यशापर्यत लवकर पोहचण्यास मदत होईल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.