AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

black thread: ज्योतिषशास्त्रानुसार ‘या’ 4 राशीच्या लोकांनी पायात चुकूनही..

never wear black thread: काळा धागा घालण्यापूर्वी, तुमची राशी आणि ग्रहांची स्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. ते तुमच्यासाठी फायदेशीर तर ठरू शकतेच, पण कधीकधी ते नकळत नुकसानही करू शकते. वास्तूशास्त्राच्या या नियमांचे पालन केल्यामुळे आयुष्यात सकारात्मकता वाढते

black thread: ज्योतिषशास्त्रानुसार 'या' 4 राशीच्या लोकांनी पायात चुकूनही..
| Edited By: | Updated on: Apr 24, 2025 | 2:54 PM
Share

शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यामुळे तुम्हाला लोगलेली नजर दूर होते. अनेकवेळा आपण अशा ठिकाणी जातो जिथे नकारात्मक गोष्टी जाणवतात ज्याचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. अनेकदा लोक वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काळा धागा घालतात. विशेषतः मुले आणि तरुणांच्या हातावर किंवा पायावर काळा धागा बांधणे सामान्य झाले आहे. असे मानले जाते की हे केवळ वाईट नजरेपासून संरक्षण करत नाही तर मनातील भीती आणि चिंता देखील दूर करते. पण प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकावर चांगला परिणाम होतोच असे नाही, काळ्या धाग्याच्या बाबतीतही असेच काहीसे घडते.

ज्योतिषशास्त्रानुसार, काळा धागा थेट शनि आणि राहू सारख्या ग्रहांशी जोडलेला असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हे ग्रह चांगल्या स्थितीत नसतील तर काळा धागा फायदेशीर ठरू शकतो. परंतु काही राशींसाठी याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घाली नये.

मेष राशी – मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो तेज आणि उर्जेचे प्रतीक मानला जातो. काळा धागा शनिशी संबंधित आहे, जो मंद गतीने काम करणारा ग्रह आहे आणि संयमाशी संबंधित आहे. या दोन्ही ग्रहांच्या स्वभावातील फरकामुळे मेष राशीच्या लोकांनी काळा धागा घालणे टाळावे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्यांच्या दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात.

कर्क राशी – कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो मन आणि भावनांवर परिणाम करतो. चंद्र जितका शांत आणि सौम्य आहे तितकाच शनि आणि राहू हे वेगळ्या स्वभावाचे मानले जातात. अशा परिस्थितीत, जर कर्क राशीच्या लोकांनी काळा धागा घातला तर मानसिक ताण आणि चिंता वाढू शकते. झोपेचा त्रास किंवा चिंतेची परिस्थिती असू शकते.

सिंह राशी – सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. ज्योतिषशास्त्रात त्याला सर्वोच्च स्थान आहे. सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. परंतु सूर्य आणि शनि यांच्यात नेहमीच विरोधाची भावना दिसून आली आहे. जर सिंह राशीच्या व्यक्तीने काळा धागा घातला तर त्याची सामाजिक प्रतिमा किंवा आत्मविश्वास प्रभावित होऊ शकतो. या राशीच्या लोकांनी हे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे.

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ देखील आहे, जो मेष राशीप्रमाणे शक्ती आणि धैर्याशी संबंधित ग्रह आहे. शनि आणि मंगळ यांचे एकमेकांशी चांगले संबंध नाहीत. जर वृश्चिक राशीच्या व्यक्तीने काळा धागा घातला तर त्याला नोकरी, आरोग्य किंवा पैशाशी संबंधित समस्या येऊ शकतात. अशा लोकांच्या आयुष्यात अनेक वेळा अनावश्यक अडथळे येऊ लागतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.