AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायच असेल तर हे 3 गुण तुमच्याकडे पाहिजेतच

आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात श्रीमंत होण्याची इच्छा असते. व्यक्ती त्याच्याजवळ असलेल्या काही खास गुणांमुळे श्रीमंत होऊ शकतो.

Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायच असेल तर हे 3 गुण तुमच्याकडे पाहिजेतच
| Updated on: Apr 19, 2025 | 8:47 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ, राजनीती तज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही व्यक्तीला आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये राजकारण, सामाजिक व्यवस्था, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे. व्यक्तीनं आपलं आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी करू नये? कोणत्या गोष्टी कराव्यात. कोणत्या गोष्टींसंदर्भात गुप्तता पाळावी? आपला खरा मित्र कसा ओळखावा? आपला शत्रू कसा ओळखावा? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? अशा एकना अनेक गोष्टींबाबत आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये माहिती सांगितली आहे.

आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात श्रीमंत होण्याची इच्छा असते. व्यक्ती त्याच्याजवळ असलेल्या काही खास गुणांमुळे श्रीमंत होऊ शकतो. व्यक्तीला ज्या गोष्टी श्रीमंत बनवू शकतात, त्या गोष्टींबद्दल आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रथांमध्ये चर्चा केली आहे, त्या गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

आर्य चाणक्य म्हणतात जर आयुष्यात तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. मेहनत ही एक अशी गोष्ट आहे, ती तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवू शकते. तुम्हाला कोणत्या दिशेनं जायचं आहे, ते आधी निश्चित करा आणि त्यानंतर तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर मेहनत करा. कठोर मेहनतीच्या बळावर तुम्ही तुमचं ध्येय निश्चितपणे सहज साध्य करू शकता.

आर्य चाणक्य म्हणतात तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जेवढी मेहनत करण्याची गरज असते तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा जर तुम्ही तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक नसाल तर तुमची मेहनत शुन्य होते. तुम्हाला इच्छित फळ मिळू शकत नाही, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगताना आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही दान केलं पाहिजे, तुमच्याकडे ज्या गरजेपेक्षा जास्त वस्तू आहेत, त्या गरजू व्यक्तीला दिल्या पाहिजेत, त्यामुळे तुमच्या यशाचा मार्ग अधिक सोपा होतो.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.