AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात पुरुषांना हे नियम माहिती असावेतच, कधीच पत्नीसोबत भांडणं होणार नाहीत

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर लिहीलं आहे. पती-पत्नीचं नातं कसं असावं? हे सांगताना चाणक्य म्हणतात असे काही नियम आहेत, जे पुरुषांना माहिती असावेतच, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य नीतीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti:  चाणक्य म्हणतात पुरुषांना हे नियम माहिती असावेतच, कधीच पत्नीसोबत भांडणं होणार नाहीत
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 8:43 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? याबाबत आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती -पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं, या विश्वासाला थोडा जरी तडा गेला तरी हे नातं फार काळ टिकेलच असं सांगता येत नाही. चाणक्य पुढे असंही म्हणतात पती पत्नी हे संसाराची दोन चाकं आहेत, त्यामुळे त्यांनी समान गतीनं चाललं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत, नियम आहेत, जे पुरुषांना माहिती हवेतच, त्यानंतर तुमचे आपल्या पत्नीशी कधीही भांडणं होणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पत्नीवर प्रेम व्यक्त करा – चाणक्य म्हणतात पतीने जेव्हा पण संधी मिळेल त्यावेळी पत्नीवर प्रेम व्यक्त केलं पाहिजे, यामुळे संसारातील गोडवा वाढतो. अनेक पुरुष असे असतात की ज्यांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम असतं, परंतु त्यांना ते आपल्या आयुष्यात कधीही व्यक्त करता येत नाही, अशावेळी पत्नीच्या मनात तुमच्या विषयी संशय निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पत्नीवरचं आपलं प्रेम व्यक्त करणं गरजेचं असतं.

हक्क सांगा – चाणक्य म्हणतात पती-पत्नीने कधीही एकमेकांवर आपला हक्क सांगण्यास लाजू नये, यामुळे पती-पत्नीमधील प्रेम अधिक वाढतं, नातं घट्ट होतं. संसार दीर्घकाळ टिकतो. पत्नी-पत्नीच्या नात्यात गोडवा आणि आनंद निर्माण होतो, त्यामुळे कधी-कधी हक्क देखील व्यक्त करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कमकुवतपणा उघड करू नका – चाणक्य म्हणतात आपल्या पत्नीसमोर कधीही तुमचा कमकुवतपणा उघड करू नका, जेव्हा तुम्ही पत्नीला तुमच्या कमकुवतपणाबद्दल सांगता, तेव्हा ती तुमच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते, अशावेळी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

जुनं प्रेम प्रकरण – चाणक्य म्हणतात आपल्या पत्नीला आपल्या जुन्या प्रेमप्रकरणाबद्दल कधीही सागू नका, कारण त्यामुळे तुमच्याबद्दल तुमच्या पत्नीच्या मनात कायम संशय राहू शकतो.

प्रामाणिकपणा –चाणक्य म्हणतात पती-पत्नीने कायम एकमेकांसोबत प्रामाणिक असं पाहिजे. तर आणि तरच संसार टिकतो, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.