AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : घरातील प्रमुखामध्ये या 4 सवयी असतील तर घरात नांदेल सुख-समृद्धी

आचार्य चाणक्यांनी दिलेल्या धोरणांचे पालन केल्याने जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण होते आणि योग्य आणि अयोग्य फरक करणे सोपे होते.

Chanakya Niti : घरातील प्रमुखामध्ये या 4 सवयी असतील तर घरात नांदेल सुख-समृद्धी
chankya nitiImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Updated on: Feb 12, 2025 | 2:38 PM
Share

आचार्य चाणक्य यांना आपण सर्वजण भारताचे महान राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. त्यांच्या धोरणांचा संग्रह ‘चाणक्य नीती’ या नावाने लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, ज्याचे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही लोकं अनुसरण करतात. आचार्य चाणक्यांनी दिलेल्या धोरणांचे पालन केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक अडचणीवर मात करू शकता आणि या धोरणांच्या मदतीने योग्य आणि अयोग्य यात फरक करणे सोपे होते. जीवनातील यश, धर्म-अधर्म, कर्म, पाप-पुण्य इत्यादींशी संबंधित अनेक गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत. याशिवाय घरातील प्रमुख कसा असावा? यासंबंधी काही गोष्टींचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार घरातील प्रमुखाचे गुण कोणते असावेत? चला तर मग जाणून घेऊयात त्या सवयींबद्दल…

अनावश्यक खर्च न करणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, घराचा प्रमुख हा सामाजिकदृष्ट्या बुद्धिमान असला पाहिजे परंतु त्याच वेळी त्यांनी कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन पैसा खर्च केला पाहिजे. तसेच खर्च मर्यादित असावा. कुटुंबातील सदस्यांच्या फालतू खर्चालाही त्यांनी आळा घातला पाहिजे. असे केल्याने कुटुंबात आर्थिक समतोल राखला जाईल.

शिस्त

आचार्य सांगतात की, घरातील प्रमुखाने संपूर्ण घरामध्ये शिस्त पाळणे फार महत्वाचे आहे. कारण शिस्तीचे पाळण करणारे घर नेहमी यशस्वी होत असते. यामुळे घरातील लोकं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात चांगला समन्वय साधू शकतात.

कुटुंबातील कोणाशीही भेदभाव करू नका

आचार्य चाणक्य नेहमी सांगतात की, कुटुंबप्रमुखाने कुटुंबातील सदस्यांमध्ये कधीही भेदभाव करू नये, तर त्या व्यक्तीने घरातील सर्वांना समान भावनेने घेऊन आणि समान नियम व नियमांचे पालन करून पुढे जावे. अशाने कुटुंबात कधीही भेदभाव होत नाही आणि घर आनंदाने नांदते.

उत्तम निर्णय घेण्याची क्षमता

आचार्य चाणक्य यांच्या मते, घराच्या प्रमुखाची निर्णय घेण्याची क्षमता कुटुंबातील इतरांपेक्षा नेहमीच चांगली असली पाहिजे कारण घराच्या प्रमुखाने घेतलेले निर्णय संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याचवेळी त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यांच्या निर्णयामुळे कुटुंबाचे कधीही नुकसान होऊ नये.

आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी.
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक.
अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला
अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोड स्थानकाच्या दिशेने निघाला.
मराठी मोर्चाची परवानगी नाकारली, मनसैनिकांच्या भावना नेमक्या काय?
मराठी मोर्चाची परवानगी नाकारली, मनसैनिकांच्या भावना नेमक्या काय?.
प्रताप सरनाईक विधानभवनातून मीरा रोडकडे रवाना
प्रताप सरनाईक विधानभवनातून मीरा रोडकडे रवाना.