AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे 3 लोक कायम गरीब राहतात, शेवटच्या श्वासापर्यंत पैशांसाठी तरसतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माणसांच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत, त्या जर सवयी एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर तो कायम गरीब राहतो, अशा माणसाजवळ कधीच पैसा टिकत नाही असं चाणक्य म्हणतात.

Chanakya Niti : हे 3 लोक कायम गरीब राहतात, शेवटच्या श्वासापर्यंत पैशांसाठी तरसतात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 7:43 PM
Share

आर्य चाणक्य हे भारतामधील एक महान अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कधी आणि कुठे खर्च करावा? पैशांची बचत कशी करावी? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाच्या अशा तीन सवयी सांगितल्या आहेत, त्या जर कुठल्याही व्यक्तीमध्ये असतील तर असा माणूस आयुष्यभर गरीब राहतो, त्याच्या हातात कधीच पैसा टिकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

कायम दुसर्‍यावर अवलंबून राहणं – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही, मात्र जे लोक कायम कष्ट टाळतात, जे कायम आपल्या छोट्या-छोट्या गरजांसाठी देखील इतर लोकांवर अवलंबून असतात. स्वत: पैसा कमवत नाही, असे लोक कायम गरीब राहतात, असे लोक ज्या व्यक्तीवर अवलंबून आहेत, तो व्यक्ती देखील यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मदत करतो, मात्र त्यानंतर अशा लोकांचं आयुष्य हे खूप बिकट बनतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

रागीट स्वभावाची माणसं – चाणक्य म्हणतात तुम्हाला कोणतीही नोकरी करायची असेल किंवा व्यवसाय करायचा असेल, त्यामध्ये प्रगती करायची असेल तर सर्वात आधी एक नियम लक्षात घ्या तो म्हणजे तुमच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे, म्हणजे समोरच्या माणसांना गोड बोलून आपलं काम आपल्याला करून घेता आलं पाहिजे, मात्र जे लोक स्वभावाने फटकळ असतात रागीट असतात असे लोक चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय किंवा नोकरी करू शकत नाहीत.

आळशी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, ते लोक देखील आयुष्यभर गरीबच राहतात. कारण आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुम्हाला प्रगती करायची असेल, भरपूर पैसा कमवायचा असेल तर आळसाचा त्याग करून कष्ट करावे लागतील त्यातच तुमचं हीत आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.