AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच…

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत? याबद्दल अनके गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात असे काही लोक येतात जे तुमचा संसार उद्ध्वस्त करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच...
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 9:20 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवी जीवनामधील नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पती पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं. जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा विवाह संस्थेचा पाया कमकुवत होतो आणि त्यामुळे संसार नावाचा वटवृक्ष कोसळतो. त्यामुळे कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांबद्दल आदर हवा, तरच तुमचा संसार दीर्घकाळ टिकतो. परंतु या जगात असे काही लोक असतात जे लोक तुमच्या वाईटावरच टपलेले असतात. असे लोक संधी मिळताच तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत. अशा लोकांपासून तुम्ही सावध असलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विश्वासघातकी जोडीदार – चाणक्य म्हणतात तुम्ही पुरुष असाल किंवा महिला, जर तुम्ही तुमच्या जोडीदारा प्रति प्रामाणिक नसाल तुम्ही त्याचा विश्वासघात करत असाल किंवा तुमचा जोडीदार तुमचा विश्वासघात करत असेल तर असे नाते फार काळ टिकत नाही, तुम्ही स्वत: तुमचं नातं तुमच्या हाताने संपुष्टात आणतात. अशा व्यक्तींचा संसार हा फार काळ टीकू शकत नाही. घरात सातत्याने वाद होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कपटी मित्र – चाणक्य म्हणतात कपटी मित्रांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, असे लोक कधीही कोणाचे नसतात. मुळात त्यांच्या मनात कपटच असल्यामुळे असे लोक जरी तुमचे मित्र असले तरी देखील ते तमचं सुख पाहू शकत नाहीत. असे लोक सातत्याने तुमच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्हाला असे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत, तसेच या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चुकीचा मित्र – चाणक्य म्हणतात अनेकदा आपण चुकीच्या लोकांसोबत मैत्री करतो, असे लोक आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कारण हे लोक कलांतराने तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, त्यांच्यामुळे तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो.

व्यसनी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधीही व्यसनी मित्र नसावेत, कारण माणूस वाईट गोष्टी लगेच शिकतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं तर तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांची संगत नेहमी टाळावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत