AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, चाणक्यांच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवाच

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांचे विचार आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात, आज आपण चाणक्य यांचे 10 असे विचार जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये त्यांनी मानवी जीवनाचं सत्य सांगितलं आहे. तसेच आयुष्य कसं जगावं याची शिकवण देखील दिली आहे.

Chanakya Niti : हे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, चाणक्यांच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवाच
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 02, 2026 | 8:27 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. जर तुम्ही संकटात आहात, तर त्यातून मार्ग कसा काढायचा? शत्रूचा पराभव कसा करायचा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण? आयुष्य कसं जगावं आणि कसं जगू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या समाजात असे काही लोक असतात जे आपल्या हातानेच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात, असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, त्यांचं मोठं नुकसान होतं. तसेच जो व्यक्ती आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करत नाही, हातात आलेल्या पैशांची उधळपट्टी करतो. ज्या लोकांना वाईट संगत असते, असे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी सांगितलेल्या त्या 10 गोष्टी.

अशा लोकांचं आयुष्य बर्बाद होतं – चाणक्य म्हणतात दुसऱ्याच्या घरात राहणारे लोक, मंत्री नसलेला राजा आणि नदीच्या काठी असलेली वृक्ष लवकरच नष्ट होतो.

अशा घरात पैसा कधीच टिकत नाही – चाणक्य म्हणतात ज्या घरात मूर्ख लोकांना अधिक किंमत दिली जाते, जेवणाच्या ताटात अन्न शिल्लक ठेवलं जातं, तसेच कुटुंबातील सदस्यांबद्दल जिव्हाळा नसतो, सारखी भांडणं होतात, अशा घरात कधीही पैसा टिकत नाही.

हे लोक कधीही उपाशी राहत नाही – चाणक्य म्हणतात जे लोक बुद्धिमान आहेत, ते लोक कधीही उपाशी राहत नाहीत. ते आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रत्येक समस्येचा उपाय शोधून काढतात.

असे लोक कायम दु:खी राहतात – चाणक्य म्हणतात जे गुरु मूर्ख शिष्यांना उपदेश देतात, ते गुरु कायम दु:खी राहतात. कारण अनेकदा असा शिष्ट त्यांच्या विद्येचा चुकीचा उपयोग करतो.

असे लोक कायम गरीब राहतात – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात, कष्ट करत नाही ते आयुष्यभर गरीब राहतात.

असे आई-वडील आपल्या मुलांसाठी शत्रू असतात – आर्य चाणक्य यांच्या मते जे आई -वडील आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत नाहीत, त्यांच्यावर संस्कार करत नाहीत, असे आई -वडील आपल्या मुलांसाठी शत्रू असतात.

असे मित्र कायम तुम्हाला दु:ख देतात – चाणक्य म्हणतात मित्रता ही नेहमी तुमच्या बरोबरीच्या व्यक्तीसोबत केली पाहिजे, जर तुमचा मित्र हा खूप गरीब असेल किंवा खूप श्रीमंत असेल तर ती मैत्री तुम्हाला कायम दु:ख देते.

आदर – चाणक्य म्हणतात ज्या ठिकाणी तुम्हाला आदर मिळत नाही, अशा ठिकाणी जाण्याची चूक कधीही करू नये.

हे 3 लोक तुमच्या सोबत असतील तर तुमचं आयुष्य व्यर्थ जातं – आर्य चाणक्य म्हणतात ज्याच्यासोबत रागीट बायको, विश्वासघातकी मित्र आणि कामचुकार नोकर असतात अशा लोकांचं आयुष्य व्यर्थ जातं.

धैर्य – चाणक्य म्हणतात परिस्थिती कशीही असो तुम्ही तुमचं धैर्य गमावू नका, शेवटी विजय तुमचाच आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेस
इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग...
तो आक्षेपार्ह व्हिडीओ अन् पुणे पुन्हा हादरलं! 500 महिला... गर्भलिंग निदानाच्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश
मोठी खळबळ!दादरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन
मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...