AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 9:08 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील त्यांची उपयोगिता सिद्ध करतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधी यश मिळतं, कधी माणूस अपयशी होतो. कधी जय होतो तर कधी पराभवाचा सामना देखील करावा लागतो. परंतु माणसाचा स्वभावच असा आहे की, तो जय मिळाला की विजयाच्या आनंदात हुरळून जातो आणि जर पराभव झाला तर खचून जातो. मात्र असं न करता दोन्ही स्थिती जो माणूस संयमाने हाताळतो तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात सर्वात शक्तिशाली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे व्यक्तीचं मूल्य. जो व्यक्ती आपले मूल्य ओळखतो तो त्याच्या आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही. ज्या व्यक्तीला समाजामधील आपली किंमत माहिती असते, जो समाजामधील आपलं मूल्य जाणतो, तो व्यक्ती आपल्या प्रत्येक लढाईत विजयी होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्तीला आपलं मूल्य माहीत असतं, अशा व्यक्तीची निर्णयक्षमता देखील उत्तम असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

वेळेचं महत्त्व – चाणक्य म्हणतात या जगात आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे वेळ, वेळ ही अशी गोष्ट आहे, जी एकदा हातातून गेली की पुन्हा परत कधीही येत नाही. जर तुम्ही योग्य वेळेला योग्य कामे केली नाहीत तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे माणसाने वेळेला किंमत दिली पाहिजे, कामं वेळेच्या वेळी केली पाहिजे. जो व्यक्ती वक्तशीर असतो, तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?