AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या दोन गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगी ठरतात. चाणक्य म्हणतात आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर कधीही दोन गोष्टींची लाज बाळगू नका, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग या दोन गोष्टींची कधीच लाज बाळगू नका, चाणक्य काय सांगतात?
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 8:15 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगित्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठारतात. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं थोडक्यात सार त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण आपल्या आयुष्यात खूप मोठं व्हावं, प्रचंड नाव कमावावं, लोकांनी आपला सन्मान करावा, आपल्याकडे एवढा पैसा असावा की आपल्याला आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. परंतु चाणक्य म्हणतात की हे यश तुम्हाला कधीच एका दिवसामध्ये प्राप्त होत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतात. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्या यशस्वी व्हायचं असेल तर या जगात अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांना तुम्ही कधीच लाजलं नाही पाहिजे, तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कष्ट – आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखादं उद्दिष्ट ठरवतात, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे, कष्टाला कधीही लाजू नका, लक्षात ठेवा जो व्यक्ती कष्ट करायला लाजतो, तो व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढी तुमची जास्त प्रगती होईल, त्यामुळे कष्टाला लाजू नका असा सल्ला चाणक्य देतात.

अज्ञान लपवू नका- चाणक्य म्हणतात तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात, त्या क्षेत्रातील तुम्हाला एखादी गोष्टी माहिती नसेल तर ती लपवू नका, किंवा तिच्याबद्दल ज्ञान घेताना लाजू नका, तर आणि तरच तुमची प्रगती होईल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?