AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2021 : देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात, जाणून घ्या यामागील कथा आणि नियम

देवी लक्ष्मीसौबत भगवान विष्णूच्या पूजेसाठी शुभ मानल्या जाणार्‍या चातुर्मास देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) 20 जुलै 2021 ते देवोत्थान एकादशी (कार्तिकी एकादशी) 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत असेल. मान्यता आहे की या चातुर्मासमध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेसाठी पाताळात जातात.

Chaturmas 2021 : देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात, जाणून घ्या यामागील कथा आणि नियम
देवशयनी एकादशी
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 19, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई : देवी लक्ष्मीसौबत भगवान विष्णूच्या पूजेसाठी शुभ मानल्या जाणार्‍या चातुर्मास देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) 20 जुलै 2021 ते देवोत्थान एकादशी (कार्तिकी एकादशी) 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत असेल. मान्यता आहे की या चातुर्मासमध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेसाठी पाताळात जातात. या वेळी भगवान विष्णूचे साधक संयम आणि नियमांनी जप, तपश्चर्या, दान इत्यादी करुन भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी उपाय करतात. हिंदू धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मातही चातुर्मासाचं विशेष महत्त्व आहे. चातुर्मास संबंधित कथा, महत्त्व आणि त्यासंबंधी नियमांबद्दल जाणून घेऊ (Chaturmas 2021 Know The Story And Importance Of Chaturmas ) –

चातुर्मासाची कथा

मान्यता आहे की, एकदा राक्षसांचा राजा विरोचनाचा मुलाचा मुलगा बलिने अश्वमेध यज्ञ करुन बरेच पुण्य अर्जित केले. यामुळे सर्व राक्षस देवतांपेक्षा उच्च श्रेणीत पोहोचले आणि त्यांनी देवतांचा राजा इंद्र याच्याकडून त्याचे सिंहासन काढून घेतले. यानंतर सर्व देवता मदत मागण्यासाठी भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले. मग भगवान विष्णूने देवतांच्या रक्षणासाठी वामन अवतार घेतला आणि बलिच्या डोक्यावर पाय ठेवून तीन पावलांमध्ये पृथ्वी, आकाश आणि पाताळ मोजून बलिला आश्रयहीन केले. पण, त्या बदल्यात बलिला पाताळाचे राज्य दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा बलिने त्याला विनंती केली की वर्षातून एकदा त्यांनी माता लक्ष्मीसोबत पाताळलोकात निवास करावा. भगवान विष्णूने तथास्तु म्हणून त्यांची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून भगवान विष्णू हे चार महिने पाताळलोकात योग निद्रेत देवी लक्ष्मीबरोबर राहतात.

चातुर्मास महत्त्व

चातुर्मास अर्थात चार महिन्यांचा हा काळ विशेषत: देवाच्या साधनेसाठी अध्यात्मिक मानला जातो. या चार महिन्यात भगवान श्री विष्णूची उपासना करण्याची परंपरा आहे. मान्यता आहे की, भगवान विष्णू सर्वव्यापी आहेत आणि ते संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता आहेत. म्हणूनच, या पवित्र महिन्यात देवी लक्ष्मीसोबत शेषनागवर झोपलेल्या विष्णूच्या मूर्तीची पूजा केली जाते. या चार महिन्यांत जो कोणी सर्व नियम पाळत भगवान विष्णूची उपासना करतो त्याला सुख आणि समृद्धी इत्यादींचा लाभ मिळतो आणि अखेर त्याला मोक्ष प्राप्त होतो.

चातुर्मासचे नियम

आयुर्वेदानुसार चातुर्मासमध्ये साधे, ताजे आणि पचण्याजोगे अन्न घ्यावे.

मांसाहारी, पालेभाज्या आणि दहीचे सेवन चातुर्मासमध्ये टाळावे.

एखाद्याने चातुर्मासात ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळले पाहिजे.

चातुर्मास दरम्यान दिवसा झोपू नये.

शरीर, मन आणि आरोग्यासाठी सर्व नियमांचे पालन करुन ध्यान, जप करावा आणि चवेचा त्याग केला पाहिजे.

Chaturmas 2021 Know The Story And Importance Of Chaturmas

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही ‘ही’ कामे करु नये

गुरुवारच्या दिवशी ही 4 कामं नक्की करा, यशाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर

Follow Us
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
Amit Thackeray | देशात लोकशाही उरली कि निव्वळ दडपशाही सुरु आहे? अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला संतप्त सवाल
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर,
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत....
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं... दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे आरोप
Abhijit Dipke | 12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं, कपडे फाडले... दिल्ली पोलिसांवर अभिजित दीपकेंचे गंभीर आरोप
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड.

125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन