AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहपंचमीला ‘या’ 5 खास गोष्टी केल्याने वाढते पुण्य, संपत्ती आणि धान्याने भरलेलं राहील घर

भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला झाला होता, म्हणून या पंचमी तिथीला विवाह पंचमी असेही म्हणतात. विवाहपंचमीला काही खास काम केल्याने पुण्यकर्मात वाढ होते आणि जीवन नेहमी आनंदी राहते. चला तर मग जाणून घेऊया विवाह पंचमीला काय करावे.

विवाहपंचमीला 'या' 5 खास गोष्टी केल्याने वाढते पुण्य, संपत्ती आणि धान्याने भरलेलं राहील घर
विवाहपंचमी
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 6:33 PM
Share

प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा विवाह मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी या तिथीला झाला होता, म्हणून शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला विवाह पंचमी असेही म्हणतात. हा सण दरवर्षी मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी साजरा केला जातो. तर आपल्या हिंदू समाजात काही लोकांची अशी विचार धारणा आहे कि विवाह पंचमीला लग्न केल्याने पती-पत्नीचे वैवाहिक जीवन संघर्षमय राहते, त्यामुळे या दिवशी आई-वडील आपल्या मुलांची लग्न करत नाहीत. तर काही लोक असेही मानतात की प्रत्येक लोकांचे स्वतःचे कर्म आणि नशीब असते, त्यानुसार इतरांचे वैवाहिक जीवन सुखी चालते, अशा परिस्थितीत विवाह पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांचे लग्न करण्यास काहीच हरकत नसते. याचबरोबर विवाहपंचमीच्या दिवशी असे काही काम अवश्य करावे, जेणेकरून तुमच्या पुण्यकर्मात वाढ होऊ शकेल. चला, जाणून घ्या विवाह पंचमीला कोणते काम करावे.

विवाह पंचमीला गरीब मुलीचे कन्यादान करा

विवाह पंचमीला गरीब मुलीचं कन्यादान जरूर करा, ज्यांना आई-वडील नाहीत अश्या मुलींचे लग्नाच्यादिवशी कन्यादान केल्यास पुण्य मिळते. तसेच शास्त्रात कन्यादान हे सर्वात मोठे दान मानले गेले आहे, म्हणून गरीब आणि गरजू मुलीचे कन्यादान केल्याने तुमचे पुण्यकर्म वाढते.

विवाह पंचमीला दान अवश्य करा

विवाह पंचमीच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार ज्या गोष्टीचे दान करता येईल ते करावे. कोणत्याही संस्थेत, गरजू व्यक्तीकडे, मंदिरात जाऊन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दानधर्मात अन्नदान, जलदान, वस्त्रदान किंवा काहीही एखाद्याच्या गरजेनुसार दान करू शकता.

विवाह पंचमीला गरिबांसाठी भंडारा ठेवा

एखाद्या भुकेल्या व उपाशी असलेल्या गरीब माणसाचे पोट भरणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. तुम्ही जर मंदिराबाहेर किंवा संस्थनामध्ये जाऊन भुकेल्या व्यक्तींना जेवण दिल्याने माणसांचे पोट भरते व त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर तुम्ही पशु-पक्ष्यांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करणेही महत्वाच आहे.

विवाह पंचमीला राम-सीतेच्या नावाने वृक्षारोपण करा

झाडे आणि वनस्पती हा निसर्गाचा च एक भाग आहे, त्यामुळे विवाहपंचमीच्या दिवशी तुम्ही जर वृक्षारोपण केल्याने निसर्गमाता प्रसन्न होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वनस्पती लावू शकता. निसर्गाला वनस्पती अर्पण केल्याने पुण्यकर्मात वाढ होते. तसेच प्रभू श्रीराम आणि माता सीतेची कृपा तुमच्यावर कायम राहते.

विवाह पंचमीला भजन, पूजा आणि गंगा स्नान करा

विवाहपंचमीचा दिवशी तुम्ही भजन-कीर्तन, पूजा आणि गंगास्नान करणे चांगले मानले जाते. त्यामुळे विवाहपंचमीला प्रभू श्रीराम आणि माता सीतेची पूजा करावी आणि भजन-कीर्तन करावे. तसेच विवाहपंचमीला गंगेचे स्नान करणे देखील खूप महत्वाचे आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना राम आणि लक्ष्मी यांचे रूप मानले जाते, म्हणून विवाह पंचमीला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा करावी.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.