AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dussehra 2022: मृत्यूसमयी रावणनाने लक्ष्मणाला सांगितले आयुष्याचे तीन रहस्य, तुम्हीही जाणून घ्या

रावण हा अत्यंत वाईट होता, मात्र त्यासोबतच तो एक विद्वान योद्धा देखील होता. रामाने रावणाचा वध केल्यानंतर रावणाने आयुष्याचे तीन रहस्य सांगितले.

Dussehra 2022: मृत्यूसमयी रावणनाने लक्ष्मणाला सांगितले आयुष्याचे तीन रहस्य, तुम्हीही जाणून घ्या
रावण दहन Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई,  देशभरात आज दसरा (Dussehra 2022) साजरा उत्साहात होत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की, रावण हा अत्यंत वाईट माणूस होता. कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता (Good Quality of Rawan). असे म्हणतात की मरताना रावणाने लक्ष्मणाला टीम महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य (Lesson From Rawan) लपलेले आहे.   रामायणातील कथेनुसार रावणाचा वध प्रभू रामाने केला होता. असे मानले जाते की, रावण हा जगातील मोठ्या विद्वानांपैकी एक होता. ती महादेवाचा खूप मोठा भक्त होता.  रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जाणकार आहे. अशा वेळी महान ज्ञानी रावणाकडून यशस्वी जीवनाचे ज्ञान घ्यावे.

हे ऐकून लक्ष्मण दशाननच्या पायाशी बसले. तेव्हा रावणाने लक्ष्मणाला जीवनातील तीन अमूल्य गोष्टी सांगितल्या. त्या तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

 पहिले रहस्य

रावणाने लक्ष्मणाला पहिली गोष्ट सांगितली की शुभ कार्य लवकरात लवकर करावे. त्यासाठी कधीही जास्त वेळ थांबू नये. कारण आयुष्य कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही.

दुसरे रहस्य

रावणाने लक्ष्मणाला दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की शत्रू आणि रोग कधीही लहान मानू नये. अगदी छोटासा आजारही जीवघेणा ठरू शकतो. अगदी लहान शत्रूही धोकादायक ठरू शकतो. रावणाने राम, लक्ष्मण आणि त्यांच्या वानरसेनेचा तिरस्कार केला होता आणि तेच रावणाच्या मृत्यूचे कारण बनले.

 तिसरे रहस्य

रावणाने लक्ष्मणाला तिसऱ्या रहस्याबद्दल सांगितले की, माणसाने स्वतःच्या  जीवनाशी संबंधित रहस्य शक्य तितके गुप्त ठेवले पाहिजे. त्याने कोणालाही ते सांगू नये. जरी तो तुमचा सर्वात प्रिय असला तरीही. जर ते रहस्य कोणाच्या समोर आले तर त्याचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रावणाच्या नाभीतील अमृतकुंडाचे रहस्य विभीषणाला माहीत होते आणि तेच रावणाच्या पराभवाचे कारण बनले.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.