AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dussehra 2022: मृत्यूसमयी रावणनाने लक्ष्मणाला सांगितले आयुष्याचे तीन रहस्य, तुम्हीही जाणून घ्या

रावण हा अत्यंत वाईट होता, मात्र त्यासोबतच तो एक विद्वान योद्धा देखील होता. रामाने रावणाचा वध केल्यानंतर रावणाने आयुष्याचे तीन रहस्य सांगितले.

Dussehra 2022: मृत्यूसमयी रावणनाने लक्ष्मणाला सांगितले आयुष्याचे तीन रहस्य, तुम्हीही जाणून घ्या
रावण दहन Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2022 | 5:02 PM
Share

मुंबई,  देशभरात आज दसरा (Dussehra 2022) साजरा उत्साहात होत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की, रावण हा अत्यंत वाईट माणूस होता. कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता (Good Quality of Rawan). असे म्हणतात की मरताना रावणाने लक्ष्मणाला टीम महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य (Lesson From Rawan) लपलेले आहे.   रामायणातील कथेनुसार रावणाचा वध प्रभू रामाने केला होता. असे मानले जाते की, रावण हा जगातील मोठ्या विद्वानांपैकी एक होता. ती महादेवाचा खूप मोठा भक्त होता.  रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जाणकार आहे. अशा वेळी महान ज्ञानी रावणाकडून यशस्वी जीवनाचे ज्ञान घ्यावे.

हे ऐकून लक्ष्मण दशाननच्या पायाशी बसले. तेव्हा रावणाने लक्ष्मणाला जीवनातील तीन अमूल्य गोष्टी सांगितल्या. त्या तीन गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

 पहिले रहस्य

रावणाने लक्ष्मणाला पहिली गोष्ट सांगितली की शुभ कार्य लवकरात लवकर करावे. त्यासाठी कधीही जास्त वेळ थांबू नये. कारण आयुष्य कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही.

दुसरे रहस्य

रावणाने लक्ष्मणाला दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली की शत्रू आणि रोग कधीही लहान मानू नये. अगदी छोटासा आजारही जीवघेणा ठरू शकतो. अगदी लहान शत्रूही धोकादायक ठरू शकतो. रावणाने राम, लक्ष्मण आणि त्यांच्या वानरसेनेचा तिरस्कार केला होता आणि तेच रावणाच्या मृत्यूचे कारण बनले.

 तिसरे रहस्य

रावणाने लक्ष्मणाला तिसऱ्या रहस्याबद्दल सांगितले की, माणसाने स्वतःच्या  जीवनाशी संबंधित रहस्य शक्य तितके गुप्त ठेवले पाहिजे. त्याने कोणालाही ते सांगू नये. जरी तो तुमचा सर्वात प्रिय असला तरीही. जर ते रहस्य कोणाच्या समोर आले तर त्याचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. रावणाच्या नाभीतील अमृतकुंडाचे रहस्य विभीषणाला माहीत होते आणि तेच रावणाच्या पराभवाचे कारण बनले.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.