AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या ‘शुर्पणखा’वर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय तिनं रावणाला कोणता शाप दिला होता?

रावणाने आयुष्यभर अशी कर्मे केली, ज्यामुळे त्याला अनेक लोकांचा शाप सहन करावा लागला. रावणाला अनेक लोकांकडून श्राप मिळाले होते. हेच श्राप पुढे जावून रावणाच्या नाशाचे कारण बनले. चला तर मग जाणून घेऊया लंकापती रावणाल कोणी श्राप दिले होते. 

ज्या 'शुर्पणखा'वर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय तिनं रावणाला कोणता शाप दिला होता?
Ravana-
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 3:50 PM
Share

मुंबई :  भगवान रामाने रावणाचा वध केला ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण सर्व काही असताना रावण यश मिळाले नाही. यामागे त्याला मिळालेले अनेक श्राप होते.रावणाने आयुष्यभर अशी कर्मे केली, ज्यामुळे त्याला अनेक लोकांचा शाप सहन करावा लागला. रावणाला अनेक लोकांकडून श्राप मिळाले होते. हेच श्राप पुढे जावून रावणाच्या नाशाचे कारण बनले. चला तर मग जाणून घेऊया लंकापती रावणाल कोणी श्राप दिले होते.

रघुवंशी अनरण्याचा शाप-

रघुवंशात अनरण्या नावाचा राजा होता. जेव्हा रावण जगावर विजय मिळवण्यासाठी निघाला होता, तेव्हा रावण आणि राजा अनरण्य यांच्यात युद्ध झाले.राजा अनरण्या या युद्धात मारला गेला पण मरण्यापूर्वी त्याने रावणाला शाप दिला होता.

नंदीचा शाप

एकदा रावण भगवान शिव यांना भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता. कैलासमध्ये रावणाने शिवाचे वाहन असलेल्या नंदी बैलाची खिल्ली उडवली. रावणाला माहीत नव्हते की नंदी हा सामान्य बैल नाही आणि त्याच्याकडे अफाट शक्ती आहेत. संतप्त नंदीने स्वतःची चेष्टा केल्याबद्दल रावणाला शाप दिला. असे पुराणामध्ये लिहले आहे.

स्त्रीचा शाप

एकदा रावण आपल्या पुष्पक विमानात प्रवास करत होता, तेव्हा त्याने एका सुंदर स्त्रीला पाहिले. ती महिला तेव्हा भगवान विष्णूची पूजा करत होती. रावणाने स्त्रियांचा आदर केला नाही. त्याने त्या महिलेचे केस ओढले आणि तिला तिच्याबरोबर जाण्याचा आदेश दिला. महिलेने तिथं आपला जीव सोडला आणि मरण्यापूर्वी रावणाला शाप दिला.

नलकुबेराचा श्राप

रावणाने जगावर विजय मिळवण्याच्या ध्येयाने स्वर्गाला गेला. तेथे रंभा नावाच्या अप्सरावर रावण मोहित झाला. परंतू रांभेला रावणाच्या मोठा भाऊ कुबेरच्या मुलगा नलकुबेरशी लग्न करायचे होते. रंभाच्या इशाऱ्यानंतरही रावणाने पालन केले नाही. नलकुबेरला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप रागावला आणि रावणाला शाप दिला.

शूर्पणखेचा शाप

रावणाला त्याची प्रिय बहीण शूर्पणखाचा शापही मिळाला होता. शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिह्वा होते आणि तो राजा कालकेयाचा सेनापती होता. कालकेयाशी झालेल्या युद्धामध्ये रावणाने विद्युतजिह्वाचा वध केला होता, त्यामुळे रागाने शूर्पणखेने रावणाला शाप दिला.

माया चा श्राप

रावणाची पत्नीच्या मोठ्या बहीणीवरवाईट नजर होती. मायाचा पती शंभर वैजंतपूरचा राजा होता. एके दिवशी रावण शंभरला भेटायला गेला आणि तिथे मायाला त्याच्या जाळ्यात अडकवले. शंभरला हे कळल्यावर त्याने रावणाला कैद केले. त्यावेळी राजा दशरथाने रावणावर हल्ला केला.शंभर युद्धात मरण पावला. यानंतर मायाने तिचा जीव सोडण्याचा निर्णय घेतला.रावणाने मायाला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. तेव्हा मायाने रावणाला शाप दिला.

इतर बातम्या :

आधुनिक ते ऐतिहासिक शस्त्रांपर्यंत…राज्यभरात दिमाखात साजरा होतोय शस्त्रपूजन सोहळा

Garuda Purana : ‘या’ शुभ गोष्टी चुकीच्या वेळी कधीच करु नका; कुटुंबाला येऊ शकतात समस्या

Dussehra2021 | निरोगी आरोग्यासाठी दसऱ्याच्या दिवशी खातात पान, काय आहे यामागील वैज्ञानिक, धार्मिक महत्त्व

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.