AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eid Milad-un-Nabi 2021 : ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, काय काय आहेत अटी आणि नियम

पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने केवळ 25 लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जेव्हा राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त 5 वाहने आणि 25 लोकांना परवानगी देणे अयोग्य आहे. हे दर्शवते की सरकार त्यांच्या समाजासोबत पक्षपात करत आहे.

Eid Milad-un-Nabi 2021 : ईद-ए-मिलादला जुलूस काढण्यास सशर्त परवानगी, काय काय आहेत अटी आणि नियम
Eid Milad-un-Nabi 2021
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 18, 2021 | 1:12 PM
Share

मुंबई : पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसानिमित्त मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने केवळ 25 लोकांना परवानगी दिली आहे. सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांबाबत मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जेव्हा राज्यात शाळा, महाविद्यालये आणि मॉल उघडले जातात, राजकीय पक्ष मोठे कार्यक्रम आयोजित करत असतात, तेव्हा ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या जुलूसमध्ये फक्त 5 वाहने आणि 25 लोकांना परवानगी देणे अयोग्य आहे. हे दर्शवते की सरकार त्यांच्या समाजासोबत पक्षपात करत आहे.

रजा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी म्हणाले की, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीत 5 ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये फक्त 5 लोक चढू शकतात. अशा प्रकारे 25 लोकांना संपूर्ण जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने 10 ट्रक आणि 150 लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

ते म्हणाले की, आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत. उच्च न्यायालयाने किमान जास्तीत जास्त लोकांना चेहल्लूम जुलूसमध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी होती. नूरी म्हणाले की, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. त्यांना आशा आहे की सोमवारपर्यंत राज्य सरकार आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करेल.

मौलाना झहीर अब्बास रिझवी म्हणाले की, सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करण्यापूर्वी ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या महत्त्वाचा विचार करायला हवा होता. हा वर्षातील एक दिवस आहे जेव्हा मुस्लिम समाजातील लोक मोठ्या आतुरतेने पैगंबर मुहम्मद यांच्या वाढदिवसाची वाट पाहत असतात. सरकारने फक्त 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. ही श्रद्धेची बाब आहे, जुलूसमध्ये आपेक्षा अधिक जण पायी सामील होऊ शकतात. त्यामुळे, उच्च न्यायालयाने दिलेली परवानगी आणि शहरातील सध्याची साथीची परिस्थिती पाहता राज्य सरकारने चहेल्लूम जुलूसमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याची परवानगी द्यायला हवी होती.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय?

मुस्लिम समाजातील लोकांनी शक्य तेवढं घरी राहून हा सण साजरा करावा

जुलूस काढण्यासाठी आयोजकांना स्थानिक पोलीस प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल

मिरवणुकीत फक्त 5 ट्रकना परवानगी आहे.

एका ट्रकमध्ये फक्त 5 लोकांना परवानगी आहे.

जुलूसमध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागेल.

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

जुलूसच्या स्वागतासाठी जर पंडाल बनवायचा असेल तर नियमांनुसार महानगरपालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. पंडालमधील व्यक्तींची संख्या स्थानिक प्रशासन ठरवेल.

कंटेनमेंट झोनमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.

स्थानिक परिस्थिती पाहता, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला निर्बंध आणखी कडक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Eid al-Adha 2021 | आज बकरी ईद , जाणून घ्या याची कहाणी आणि महत्त्व

Bakrid 2021 Guidelines Maharashtra : ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?