AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!

स्थिर जीवन जगण्यासाठी नोकरी खूप महत्वाची आहे. व्यवसाय म्हणून नोकरी निवडणाऱ्यांना एखाद्या संस्थेत चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते. बर्‍याच वेळा लोक नोकरीसाठी खूप धावपळ करतात आणि त्यांना सतत मुलाखतीला सामोरे जावे लागते. खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही त्यांना नोकरी मिळत नाही.

ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!
नोकरी
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 1:35 PM
Share

मुंबई : स्थिर जीवन जगण्यासाठी नोकरी (Job) खूप महत्वाची आहे. व्यवसाय म्हणून नोकरी निवडणाऱ्यांना एखाद्या संस्थेत चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते. बर्‍याच वेळा लोक नोकरीसाठी खूप धावपळ करतात आणि त्यांना सतत मुलाखतीला सामोरे जावे लागते. खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही त्यांना नोकरी मिळत नाही. खरे तर सुखी आणि स्थिर जीवन जगण्यासाठी यशस्वी आणि स्थिर नोकरीची गरज असते.

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रहांच्या कमकुवत आणि वाईट स्थानामुळे बऱ्याच वेळा आपल्याला नोकरी लागताना समस्या निर्माण होतात. ज्यांना नोकरी मिळण्यात अडचण येत आहे, त्यांनी ज्योतिषाचीही मदत घ्यावी. दैनंदिन जीवनात काही सोपे उपाय केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि जीवनात आनंद येऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला नोकरी लागण्यासाठी मदत करू शकतात.

-दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात गूळ टाकून सूर्याला जल अर्पण करा. यशस्वी करिअर आणि नोकरीसाठी हे सर्वात प्रभावी ज्योतिषीय उपायांपैकी एक मानले जाते.

-सुंदरकांडच्या ग्रंथात अशी शक्ती आहे. ज्यामुळे मन शांत होते. साहजिकच मन शांत असेल तर तुम्ही ध्येयाकडे अधिक लक्ष देऊ शकाल. त्यामुळे आजपासूनच रोज सुंदरकांड वाचा, कारण ज्योतिष शास्त्रानुसार ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

-कष्ट करूनही नोकरी मिळत नसेल तर हनुमानजींना प्रसन्न करावे. मंगळवारी 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा आणि पिवळा सिंदूरही अर्पण करा. तसेच या दिवशी दिवा लावणे देखील तुमच्या करिअरसाठी चांगले राहील. तसेच, हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करा आणि हा प्रसाद किमान 11 गरीब लोकांना वाटा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन हे प्रसिध्द करण्यात आले आहे.)

संबंधित बातम्या : 

रावणाचा वध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी महादेवाला या स्तुतीने केले होते प्रसन्न, शिव रुद्राष्टक स्तोत्राबद्दल जाणून घ्या!

पौष महिन्यातील रविवारी या प्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, धन-समृद्धीची कमतरता होणार नाही!

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.