AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या वचनांचे करा पालन

जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी क्रांतिकारक व्हावे लागले तरी त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाचा विचार न करता आपले काम पूर्ण करा.

जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या वचनांचे करा पालन
जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या वचनांचे करा पालन
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 30, 2021 | 3:36 PM
Share

मुंबई : आज जगभरात भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी होत आहे. आजच्या युगात ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ते बचतीचा विचारही करत नाहीत आणि ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांना बचतीचा मार्ग माहित नाही. आज आम्ही तुम्हाला भगवान श्री कृष्णाच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचे पालन करुन तुम्ही फक्त पैसे कमवू शकणार नाही तर जतन करू शकाल आणि गरज पडल्यावर त्याचा वापर करू शकाल. (Follow these words of Lord Krishna to achieve success in life)

भगवान श्रीकृष्णाच्या या गोष्टी आयुष्य बदलतील तुमचे

आपल्या सर्वांना माहीत आहे की अर्जुनाने श्रीकृष्णाच्या वचनांचे पालन करून यश मिळवले होते. त्याचप्रमाणे कृष्णाच्या या गोष्टींचे पालन करुन आपण आपल्या जीवनात यश मिळवू शकतो. यात शंका नाही की यामुळे तुम्हाला केवळ चांगले आयुष्य मिळणार नाहीत तर या स्पर्धात्मक युगात तुम्हाला एक यशस्वी व्यक्तिमत्व देतील.

श्रीकृष्णाच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

– जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी क्रांतिकारक व्हावे लागले तरी त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाचा विचार न करता आपले काम पूर्ण करा.

– आयुष्यात मित्रांची भूमिका खूप महत्वाची असते. आपण नेहमी ऐकतो की खऱ्या मित्राची पारख नेहमी कठिण काळात होते. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या कठिण काळात पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मित्रांनाही आधार दिला पाहिजे. यासोबतच तुम्ही असे मित्र बनवा जे तुमच्या कठिण काळात तुमच्या पाठिशी उभे राहतील.

– जीवनात विजय आणि पराभव असतो, परंतु यश फक्त त्या व्यक्तीला मिळते जे त्याच्या चुका आणि अपयश यातून धडा घेत पुढे जातात. निराश होणे हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही.

– कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी अधिक चांगली रणनीती बनवणे खूप महत्वाचे आहे. रणनीतीशिवाय, आपण प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊ शकणार नाही. जर पांडवांनीही श्रीकृष्णाने बनवलेल्या रणनीतीचे पालन केले नसते, तर कदाचित त्यांनी कौरवांविरुद्धचे युद्ध जिंकले नसते.

– जीवनात यश मिळवण्यासाठी तुमचे विचार दूरदर्शी असले पाहिजेत. यासह, आपल्याला आयुष्यात येणाऱ्या बिकट परिस्थितीचे मूल्यांकन करता आले पाहिजे.

– एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दररोज कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागते. श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की वाईट परिस्थितीत हार मानण्याऐवजी आपण त्यांचा सामना केला पाहिजे. कारण असे केल्यानेच आपल्या मनात असलेली भीती संपेल आणि एकदा भीती दूर झाली की व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकते.

– जीवनात यशस्वी होण्यासाठी, अनावश्यक चिंतांसह भविष्याचा विचार करू नये. आपण आपले वर्तमान नेहमी चांगले बनवले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या वर्तमानाची काळजी घेतली तर तुमचे भविष्य आपोआप चांगले होईल. या व्यतिरिक्त, आयुष्यात कधीही अनुशासनहीन नसावे.

– आजच्या काळात लोक त्यांच्या उत्पन्नानुसार खर्च करतात. पण अशा परिस्थितीत गरज असताना त्यांच्याकडे पैसे नसतात. कोणत्याही प्रकारच्या कठिण आर्थिक परिस्थिती टाळण्यासाठी, एखाद्याने नेहमी शहाणपणाने खर्च केला पाहिजे. आपल्याला गरज नसलेली वस्तू खरेदी करण्यासाठी कधीही पैसे खर्च करू नका. (Follow these words of Lord Krishna to achieve success in life)

इतर बातम्या

वाढदिवस, साखरपुडा, विवाहाची बोलणी करायचीय? मग कार्यक्रम स्थळाचा पत्ता ‘पुणे मेट्रो’!

ED Raid: शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू; भावना गवळींचा गंभीर आरोप

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?