AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या वचनांचे करा पालन

जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी क्रांतिकारक व्हावे लागले तरी त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाचा विचार न करता आपले काम पूर्ण करा.

जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या वचनांचे करा पालन
जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या या वचनांचे करा पालन
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 3:36 PM
Share

मुंबई : आज जगभरात भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी होत आहे. आजच्या युगात ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ते बचतीचा विचारही करत नाहीत आणि ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांना बचतीचा मार्ग माहित नाही. आज आम्ही तुम्हाला भगवान श्री कृष्णाच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचे पालन करुन तुम्ही फक्त पैसे कमवू शकणार नाही तर जतन करू शकाल आणि गरज पडल्यावर त्याचा वापर करू शकाल. (Follow these words of Lord Krishna to achieve success in life)

भगवान श्रीकृष्णाच्या या गोष्टी आयुष्य बदलतील तुमचे

आपल्या सर्वांना माहीत आहे की अर्जुनाने श्रीकृष्णाच्या वचनांचे पालन करून यश मिळवले होते. त्याचप्रमाणे कृष्णाच्या या गोष्टींचे पालन करुन आपण आपल्या जीवनात यश मिळवू शकतो. यात शंका नाही की यामुळे तुम्हाला केवळ चांगले आयुष्य मिळणार नाहीत तर या स्पर्धात्मक युगात तुम्हाला एक यशस्वी व्यक्तिमत्व देतील.

श्रीकृष्णाच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

– जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी क्रांतिकारक व्हावे लागले तरी त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाचा विचार न करता आपले काम पूर्ण करा.

– आयुष्यात मित्रांची भूमिका खूप महत्वाची असते. आपण नेहमी ऐकतो की खऱ्या मित्राची पारख नेहमी कठिण काळात होते. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या कठिण काळात पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मित्रांनाही आधार दिला पाहिजे. यासोबतच तुम्ही असे मित्र बनवा जे तुमच्या कठिण काळात तुमच्या पाठिशी उभे राहतील.

– जीवनात विजय आणि पराभव असतो, परंतु यश फक्त त्या व्यक्तीला मिळते जे त्याच्या चुका आणि अपयश यातून धडा घेत पुढे जातात. निराश होणे हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही.

– कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी अधिक चांगली रणनीती बनवणे खूप महत्वाचे आहे. रणनीतीशिवाय, आपण प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊ शकणार नाही. जर पांडवांनीही श्रीकृष्णाने बनवलेल्या रणनीतीचे पालन केले नसते, तर कदाचित त्यांनी कौरवांविरुद्धचे युद्ध जिंकले नसते.

– जीवनात यश मिळवण्यासाठी तुमचे विचार दूरदर्शी असले पाहिजेत. यासह, आपल्याला आयुष्यात येणाऱ्या बिकट परिस्थितीचे मूल्यांकन करता आले पाहिजे.

– एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दररोज कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागते. श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की वाईट परिस्थितीत हार मानण्याऐवजी आपण त्यांचा सामना केला पाहिजे. कारण असे केल्यानेच आपल्या मनात असलेली भीती संपेल आणि एकदा भीती दूर झाली की व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकते.

– जीवनात यशस्वी होण्यासाठी, अनावश्यक चिंतांसह भविष्याचा विचार करू नये. आपण आपले वर्तमान नेहमी चांगले बनवले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या वर्तमानाची काळजी घेतली तर तुमचे भविष्य आपोआप चांगले होईल. या व्यतिरिक्त, आयुष्यात कधीही अनुशासनहीन नसावे.

– आजच्या काळात लोक त्यांच्या उत्पन्नानुसार खर्च करतात. पण अशा परिस्थितीत गरज असताना त्यांच्याकडे पैसे नसतात. कोणत्याही प्रकारच्या कठिण आर्थिक परिस्थिती टाळण्यासाठी, एखाद्याने नेहमी शहाणपणाने खर्च केला पाहिजे. आपल्याला गरज नसलेली वस्तू खरेदी करण्यासाठी कधीही पैसे खर्च करू नका. (Follow these words of Lord Krishna to achieve success in life)

इतर बातम्या

वाढदिवस, साखरपुडा, विवाहाची बोलणी करायचीय? मग कार्यक्रम स्थळाचा पत्ता ‘पुणे मेट्रो’!

ED Raid: शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, नोटीस न येताच ईडीच्या चौकशा सुरू; भावना गवळींचा गंभीर आरोप

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.