AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2023 : गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते? तुम्हाला माहिती आहे का यामागचे कारण

चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Ganeshotsav 2023 : गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते? तुम्हाला माहिती आहे का यामागचे कारण
गणेश विसर्जनImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 25, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस असतो. पंचांगानुसार गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केले जाते. सुख-समृद्धीसाठी, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते. तर गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला विसर्जनाने होते. चला जाणून घेऊया गणेश विसर्जन का केले जाते. तसेच त्याचा शुभ काळ आणि महत्त्व काय आहे.

गणेश विसर्जनाचे महत्व

हिंदू धर्मात गणेशाला बुद्धी, वाणी आणि बुद्धीची देवता मानले जाते. यामुळेच कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम गणपतीचे आवाहन केले जाते. त्यानंतरच इतर देवी-देवतांची पूजा केली जाते. श्रीगणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. यासोबतच श्रीगणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो.

यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर, गुरुवारी येत आहे. अनंत चतुर्दशी हा सण भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. यामध्ये उपवासाचा संकल्प घेऊन अनंतसूत्र बांधले जाते. असे मानले जाते की ते धारण केल्याने त्रास दूर होतात. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि पूजा करताना पवित्र धागा बांधतात.

अनंत चतुर्दशी शुभ मुहूर्त

उदय तिथीनुसार, गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल. चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर रोजी रात्री 10.18 वाजता सुरू होईल आणि 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.49 वाजता समाप्त होईल. अनंत चतुर्दशीची पूजा वेळ सकाळी ६.१२ ते सायंकाळी ६.४९ अशी असेल.

गणेश विसर्जनाची पौराणिक

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते, कारण असे मानले जाते की गणपती हे जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार, वेद व्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहीत असत. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. ते सतत 10 दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. त्यांचे शरीर थंड करण्यासाठी, वेद व्यासजींनी त्यांना पाण्यात बुडवले, ज्यामुळे त्याचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड करण्यासाठी केले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.