AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gayatri Mantra : 99 टक्के लोकांना नाही माहिती गायत्री मंत्राबद्दलचे हे तथ्य, मंत्रजाप करण्याआधी करावा लागतो हा विशेष विधी

हा एवढा प्रभावी मंत्र आहे ज्याच्या जपाने परमपिता परमात्मा देवादि देव महादेव भगवान शिव प्रसन्न होतात. या मंत्राचा नियमित जप करून लंकापती रावणाने भगवान शंकराला प्रसन्न केले होते.

Gayatri Mantra : 99 टक्के लोकांना नाही माहिती गायत्री मंत्राबद्दलचे हे तथ्य, मंत्रजाप करण्याआधी करावा लागतो हा विशेष विधी
गायत्री मंत्रImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 03, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे मंत्र रचले गेले आहेत. हे मंत्र सिद्ध केल्याने भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त होते. आज आपण गायत्री मंत्राबद्दल (Gayatri Mantra Benefits) जाणून घेणार आहोत. हा एवढा प्रभावी मंत्र आहे ज्याच्या जपाने परमपिता परमात्मा देवादि देव महादेव भगवान शिव प्रसन्न होतात. या मंत्राचा नियमित जप करून लंकापती रावणाने भगवान शंकराला प्रसन्न केले होते. भगवान शिव व्यतिरिक्त, गायत्री मंत्र माता गायत्री आणि सूर्यदेव यांना देखील समर्पित आहे. या मंत्राच्या सामर्थ्याने मनावर नियंत्रण ठेवता येते. या महान मंत्राने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

गायत्री मंत्र (Gayatri Mantra Rules) हा सर्व शक्तीशाली मानला जातो आणि कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. या मंत्रात अनेक शक्ती आहेत, ज्याचा जप केल्यावरच तुम्हाला जाणवेल. ब्रह्मऋषी विश्वामित्र यांनी ऋग्वेदातही या मंत्राचा उल्लेख केला आहे. परंतु या मंत्राशी संबंधित दोन विधाने आहेत, पहिली म्हणजे या मंत्राचा जप स्त्रियांना निषिद्ध आहे. दुसरे म्हणजे पुरुषांनी यगोपवित धारण केल्याशिवाय गायत्री मंत्राचा जप करू नये.

गायत्री मंत्राचा जप स्त्रियांनी का करू नये

वैदिक प्रथेनुसार गायत्री मंत्राला शिव, ब्रह्मा, वसिष्ठ, शुक्राचार्य आणि विश्वामित्र यांचा शाप आहे. वास्तविक, या मंत्राचा चुकीचा वापर होऊ नये, म्हणून शापापासून मुक्ती मिळाल्यावरच या मंत्राचा जप करावा. मंत्र जपण्यापूर्वी त्याची शापमुक्ती पद्धत अवलंबली जाते. शापमुक्ती पद्धतीशिवाय गायत्री मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते. त्यामुळेच याविधीचे पालन न करताच मंत्रजाप केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारची सिद्धी मिळू शकत नाही. गायत्री मंत्र शापमुक्तीच्या पद्धतीशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. साधारणपणे 90 टक्के लोकं गायत्री मंत्राचा सहज जप करतात. त्यामुळे त्यांना या मंत्राचे पूर्ण फळ कधीच मिळत नाही.

मंत्राशी संबंधीत तथ्य

या मंत्राशी संबंधित काही तथ्ये आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. यातील एक तथ्य म्हणजे महिलांनी गायत्री मंत्राचा जप करू नये. शास्त्रानुसार महिलांनी गायत्री मंत्राचा जप करू नये. या वस्तुस्थितीमागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारण आहे. असे मानले जाते की शतकानुशतके स्त्रिया देखील पवित्र धागा घालत असत आणि पुरुषांप्रमाणे धार्मिक कार्यात भाग घेत असत. पण काही काळानंतर परिस्थिती बदलली. महिलांनी गायत्री मंत्राचा जप न करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मासिक पाळी. हिंदू धर्मानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यात आणि पूजेत भाग घेऊ नये. त्यामुळे महिलांनी गायत्री मंत्राचा जप करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.