AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Conch Shell Remedies | विष्णूच्या आवडत्या शंखाची उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी ? जाणून घ्या शंखासंबंधीत रहस्य

शंखाच्या पवित्र नादाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सर्व काही शुभ होते. अशी मान्यता आहे. चला तर मग धर्म आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शंखाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात. 

Conch Shell Remedies | विष्णूच्या आवडत्या शंखाची उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी ? जाणून घ्या शंखासंबंधीत रहस्य
know Conch Shell Remedies
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 1:59 PM
Share

मुंबई (मृणाल पाटील) : हिंदू परंपरेत (Hindu Religion) शंखाला खूप महत्त्व आहे. अनेक देवी-देवतांनी हातात आपल्याला शंख पाहायला मिळतात. अनेक संत प्राचीन काळापासून देवाची पूजा (Puja) आणि उपासना करण्यासाठी शंखाचा (Shankh) वापर करतात. पण या पवित्र शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि विविध प्रकारच्या शंखांचे महत्त्व काय आहे. धार्मिक-अध्यात्मिक व्यवहारात वापरल्या जाणार्‍या शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाल्याचे मानले जाते. त्यानंतर ते प्रथम भगवान विष्णूंनी परिधान केला होते. समुद्रमंथन हे देखील देवी लक्ष्मीचेच रूप असल्याने शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. वास्तुशास्त्रातसुद्धा शंख खूप शुभ मानला जातो.आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये शंख असते. पूजेमध्ये वापरण्यात येणारे शंख हे घराच्या प्रगतीसाठी शुभ मानले जाते. शंखाच्या पवित्र नादाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सर्व काही शुभ होते. अशी मान्यता आहे. चला तर मग धर्म आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शंखाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.

शंखांचे प्रकार 1 गणेश शंख पूजेत वापरल्या जाणार्‍या गणेश शंखाचा आकार गणपतीसारखा असतो म्हणूनच त्याला गणेश शंख म्हणतात. या शंखाचा पूजेत त्याचा उपयोग केल्याने मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.

2 दक्षिणावर्ती शंख विविध प्रकारच्या शंखांमध्ये दक्षिणावर्ती शंखाला खूप महत्त्व आहे. ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. जर तुम्हाला आर्थिक अडचणींवर मात करायची असेल तर तुमच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करणे उत्तम मानले जाते.

शंखाचा उगम देवपूजेत वापरण्यात येणारा शंख अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्ही योग्य निरीक्षण केले असेल तर हिंदू धर्माशी संबंधित सर्व देवी-देवतांनी शंख आपल्या हातात धरला आहे. शंखाशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतात की, ज्या घरात रोज पूजेत शंख वाजविला ​​जातो, त्या घरातून सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडथळे दूर होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य यांचे निवासस्थान राहते. समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या 14 रत्नांपासून शंखाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. यामुळेच याला रत्न असेही म्हणतात, जे केवळ खेळण्यासाठीच नाही तर परिधान करण्यासाठी देखील वापरले जाते. माता लक्ष्मीचाही जन्म समुद्रमंथनातून झाला असल्याने शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. यामुळेच ज्या घरात शंख असतो, त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमी राहतो

शंखाचे धार्मिक-आध्यात्मिक फायदे

  • असे मानले जाते की ज्या घरात शंख ठेवला जातो आणि तो दररोज वाजविला ​​जातो, तेथे धनाची देवी लक्ष्मीचा वास राहतो.
  •  शंखध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते .
  •  शंख फुंकल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्याचप्रमाणे शंख फुंकल्याने योगाच्या तीन क्रिया – पूरक, कुंभक आणि प्राणायाम एकाच वेळी पूर्ण होतात. त्यामुळे असे मानले जाते की जो शंख फुंकतो त्याला दीर्घायुष्य लाभते.
  • जर तुम्ही आर्थिक अडचणीतून जात असाल आणि खूप प्रयत्न करूनही धनदेवतेचा आशीर्वाद मिळत नसेल तर तुम्ही घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करून त्याची रोज पूजा करावी. असे मानले जाते की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख राहतो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास असतो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Shattila Ekadashi | षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट

Chanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील

28 January 2022 Panchang | 28 जानेवारी 2022, शुक्रवारचे पंचांग, जाणून घ्या ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Follow Us
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...