AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराज कधीपर्यंत जीवंत राहतील ? अशुतोष राणा यांची धक्कादायक भविष्यवाणी ! ऐकून हैराण व्हाल

संत प्रेमानंद महाराज यांच्या संदर्भातील एका बातमीमुळे त्यांचे अनुयायी चिंतेत सापडले आहेत. त्यांच्या किडनीच्या आजारात संदर्भातील ही चिंता आहे. प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडनी कामातून गेल्या आहेत. त्यांना डायलिसिस करावे लागते..

प्रेमानंद महाराज कधीपर्यंत जीवंत राहतील ? अशुतोष राणा यांची धक्कादायक भविष्यवाणी ! ऐकून हैराण व्हाल
| Updated on: Feb 28, 2025 | 9:17 PM
Share

जेव्हा एखाद्या माणसाच्या ९० टक्के किडनी डॅमेज झालाय म्हणजे अशा माणसाची जगण्याची आशा धूसर असते. असेच काहीसे प्रेमानंद महाराजांबद्दल देखील बोलता येईल. त्यांना डॉक्टरांनी ते फार काळ राहणार नाहीत असे म्हटले आहे.परंतू प्रेमानंद आज २० ते २५ वर्षांपासून ठणठणीत आहेत. आता त्यांच्या बद्दल भविष्यवाणी केली गेली आहे, ही भविष्यवाणी कोणा ज्योतिषाने नव्हे ते बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणा यांनी केली आहे.

बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणा अलिकडे प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. आशुतोष राणा यांनी प्रेमानंद यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांना सांगितले की मी एक अभिनेता आहे. माझे नाव आशुतोष राणा आहे.माझी एक इच्छा होती तुम्हाला भेटायची. माझा मुलगा आणि पत्नीने देखील तुम्हाला नमस्कार केला आहे, त्यांना आशीर्वाद द्यावा…माझा लहान मुलगा तुमचे प्रवचन खूप ऐकतो. त्यानेही तुम्हाला चरण स्पर्श म्हटले आहे.आणि तुमच्या उत्तम आरोग्यसाठी आम्ही सर्व प्रार्थना करतोय असं आशुतोष राणा यांनी म्हटले आहे. यावर प्रेमानंद महाराज यांनी ही सर्वा देवाची कृपा आहे.जर आपले शरीर किंवा मन आरोग्यदायी असेल तर काही फरक पडत नाही असे महाराज यावेळी म्हणाले.

पण आता विचारणार नाही

संतांची वाणी ऐकल्यानंतर अभिनेता आशुतोष राणा हसत म्हणाले की आम्हाला तर तुम्ही एकदम परम स्वस्थ वाटत आहात. यावर संत महाराज हसत म्हणाले रोज डायलिस होत आहे. तेव्हा आशुतोष म्हणाले आम्हाला तर वाटत नाही. अशा प्रकारे बराच काळ दोघांमध्ये गप्पा चालल्या. आम्हाला तर शरीर आणि आत्म्यावरुन तुम्ही आरोग्यदायी वाटता. अभिनेता आशुतोष राणा म्हणाले आधी मी तुमच्या तब्येती संदर्भात लोकांकडे चौकशी करायचो आणि पण आता विचारणार नाही. परंतू आता आम्हाला वाटते तुम्ही ८० ते ८५ वर्ष आरामात जगाल असे यावेळी आशुतोष राणा म्हणाले.

या गोष्टीलाच आता २० ते २५ वर्षे झालीत.

यावर संत महाराज जोरात हसले आणि म्हणाले अनेक वर्षांपूर्वी मला एक संत भेटले होते. त्यांनी माझ्याकडे पहात विचारले की तुम्ही एवढे चिंता कसली करत आहात? त्यावेळी मी उदास होत म्हणालो की माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत. डॉक्टरांनी माझा मृत्यू केव्हा होऊ शकतो असे म्हटले आहे. हे ऐकून ते संत म्हणाले माझे आयुष्य ८० ते ८५ वर्षे आहे. प्रेमानंद महाराज म्हणाले की या गोष्टीलाच आता २० ते २५ वर्षे झाली आहेत.

Follow Us
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.