AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुळ्या आहेत खूपच चत्मकारी, तिजोरीत ठेवल्या तर कधीच पैसा पडणार नाही कमी!

निसर्गात अशी अनेक झाडं आहेत, हिंदू धर्मात त्या झाडांची पूजा केली जाते. आज आपण अशाच एका झाडाबाबत बोलणार आहोत. ज्याचे शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत.

या मुळ्या आहेत खूपच चत्मकारी, तिजोरीत ठेवल्या तर कधीच पैसा पडणार नाही कमी!
| Updated on: Nov 22, 2024 | 7:22 PM
Share

निसर्गात अशी अनेक झाडं आहेत, हिंदू धर्मात त्या झाडांची पूजा केली जाते. वडाचं झाड हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं.त्यामुळे या झाडाची पूजा करण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. वट पौर्णिमेच्या दिवशी याच वृक्षाची पूजा केली जाते. हिंदू धर्मानुसार विवाहित स्त्रीया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सुखासाठी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना करतात. हिंदू धर्म ग्रथांनुसार असं मानलं जात की वडाच्या झाडामध्ये विष्णू, ब्रम्ह आणि महेश अशा तीन देवतेंचं वास्तव्य असतं. या झाडाचं वैशिष्ट म्हणजे या झाडाला प्रचंड लांब अशा मुळ्या असतात. त्याच मुळ्या परत जमिनीमध्ये घूसुन दुसरा एक वृक्ष तयार होतो. मुळ्यांचा भक्कम आधार असल्यामुळे हा वृक्ष प्रचंड प्रमाणात फोफावतो महाकाय बनतो.काही वट वृक्ष तर एवढे प्रचंड असतात की एकाच झाडाखाली हजारो लोकांना सावली मिळू शकते.

वट वृक्षाची जी मूळं असतात त्याचे शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. या मुळांमध्ये तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्याची ताकत आहे. या मुळांच्या काही उपयांमुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होऊ शकते. जाणून घेऊयात नेमकं काय करायचं? हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. हिंदू धर्मात विवाहित स्त्रीया वट पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षाची आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात. तसेच सात जन्म मला हाच पती मिळू दे अशी प्रार्थना देखील करतात. असं मानलं जता की या वृक्षाखाली विष्णू ब्रम्ह आणि महेश अर्थात महादेव या तीन देवांचा निवास असतो. त्यामुळे या झाडाची पूजा केल्यानं तुमच्या घरात आर्थिक समृद्धी येते.

या झाडाची नियमित पूजा करावी, तसेच यासोबतच जर तुम्ही वडाच्या झाडाच्या मुळ्या घरी आणून त्या लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या घराची आर्थिक भरभराट होते. खर्चाचे प्रमाण कमी होऊन तुम्हाला कधीही पैशांची कमतरता जाणवत नाही.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.