AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaal Bhairav Jayanti 2024: 22 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती, जाणून घ्या पूजेचं महत्त्व आणि जन्म कथा

कालभैरवाच्या पूजेला हिंदू शास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. कालभैरव हा शिव अवतार असून क्रोध, शक्ति आणि न्यायाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. 22 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे.

Kaal Bhairav Jayanti 2024: 22 नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती, जाणून घ्या पूजेचं महत्त्व आणि जन्म कथा
| Updated on: Nov 21, 2024 | 5:55 PM
Share

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. यंदा कालभैरव जयंती 22 नोव्हेंबरला आली आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी सुरु होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी संपेल. त्यामुळे 22 नोव्हेंबरला शुक्रवारी कालभैरव जयंती साजरी केली जाईल. कालभैरवाना पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं. कालभैरवाच्या जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्त्वपूर्ण कथा सांगितली गेली आहे. कालभैरवाच्या रुपाकडे क्रोध, शक्ति आणि न्यायाचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. याबाबत एक कथा सांगितली गेली आहे.

एकदा ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण? यावरून वाद झाला. सर्व देवता यात सहभागी झाले होते. तेव्हा सर्वांसमोर भगवान ब्रह्माने पाचव्या मुखाने सृष्टीचा रचियेता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता. तेव्हा शिवाने त्यांना नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला. पण ब्रह्मदेवांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि भगवान शिवाचा अपमान केला. भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रुप धारण केलं. या रुपाला कालभैरव असं पुजलं गेलं.

कालभैरवाच्या हातात त्रिशुळ, कमंडलु होतं तसेच गळ्यात नरमुंडची माळ होती. त्यांची उत्पत्ति ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती.कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवं मुख कापलं. कारण ते अहंकाराचं प्रतिक होतं. त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक कबुल केली आणि क्षमा मागितली. पण ब्रह्मदेवांचं शिर कापल्याने पाप लागलं होतं. प्रायश्चित म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापातून मुक्त झाले. यामुळेच काशीला मुक्ती स्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं संबोधलं जातं.

कालभैरवाची पूजा कशी कराल?

पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेसाठी तयारी करा. कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो. भगवान शंकर आणि कालभैरवाचं छबीसमोर दिवा लावा. मध्यरात्री धूप, काळे तीळ, दिवा, उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी. कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळांचा नैवेद्य दाखवा. तसेच जिलेबी किंवा इमारतीचा नैवेद्य दाखवावा. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणा आणि आरती करा. शेवटी क्षमा प्रार्थना करा आणि काळ्या कुत्र्‍याला भोजन द्या. काळा कुत्रा हा कालभैरवाचं वाहन असल्याने लाभ मिळतो. त्यानंतर 108 वेळा ओम कालभैरवाय नम: या मंत्राचा जप करा.

Follow Us
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....