AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एरंडेल तेलाने दिवे लावा अन् प्रदूषण टाळा, दिवाळीसाठी सद्गुरूंचा खास सल्ला

Sadguru: दिवाळी निमित्त सद्गुरूंनी या दिव्यांच्या सणाचे महत्त्व सांगताना एक विशेष संदेश दिला. त्यांनी लोकांना अंतर्मुख होण्याचे आणि आपल्यातील दिवा प्रज्वलित करण्याचे आवाहन केले, तसेच त्यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एरंडेल तेलाने दिवे लावा अन् प्रदूषण टाळा, दिवाळीसाठी सद्गुरूंचा खास सल्ला
Sadguru
| Updated on: Oct 20, 2025 | 3:54 PM
Share

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. या दिवाळी निमित्त सद्गुरूंनी या दिव्यांच्या सणाचे महत्त्व सांगताना एक विशेष संदेश दिला. त्यांनी लोकांना अंतर्मुख होण्याचे आणि आपल्यातील दिवा प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी लिहिले की, ‘अंधाराचा नाश करणे हा प्रकाशाचा स्वभाव आहे. तुमच्यातील अंतःप्रकाश वृद्धिंगत होवो, हा प्रकाश तुम्हाला आणि तुम्ही स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रकाशित करो. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत.

दीपावली बद्दल बोलताना सद्गुरूंनी म्हटले की, ‘प्रकाशातच आपण अधिक चांगले पाहू शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला चांगले दिसत नाही तोपर्यंत आपण चालू शकतो का? पळू शकतो का? काही चांगले करू शकतो का? आपल्याला स्पष्टपणे पाहण्याची गरज आहे. स्पष्टपणे पाहणे हे केवळ डोळ्यांनी नव्हे तर मनानेही स्पष्ट पाहायला हवे. जर आपल्याला गोष्टी स्पष्टपणे पाहता येत नसतील तर आपण कुठेच पोहोचणार नाही.’

दीपावलीच्या शास्त्रीय कारणाबद्दल बोलताना सद्गुरू म्हणाले की, ‘ही परंपरा ऋतूंच्या बदलाच्या सखोल अभ्यासातून आलेली आहे. हिवाळ्यात जेव्हा पृथ्वीचा उत्तर भाग सूर्यापासून दूर जातो तेव्हा सूर्यप्रकाश कमी होतो. त्यामुळे या काळात मानसिकच नव्हे तर शारीरिक पातळीवरही एक विशिष्ट नैराश्य येते. त्यामुळे दिवाळीला दिवे लावून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण दिवाळीला विविध प्रकारचे दिवे लावू शकतो, परंतु एरंडेल तेलाचा दिवा लावणे हे फायदेशील ठरते, कारण यामुळे प्रदूषण कमी होते.

भारतीय संस्कृती आणि भारतीय उत्सवांचे महत्त्व अधोरेखित करताना सद्गुरु म्हणाले की, भारतीय संस्कृती अशा संस्कृतीतून येते जी निर्भय, लोभी आणि निर्दोष मानव निर्माण करण्याचा प्रयत्न करते. भीती का निर्माण होते यावर बोलताना सद्गुरु म्हणाले की, ‘आपल्या मनात अनेकदा भीती निर्माण होते कारण एखादी गोष्ट ही प्रथमच घटत असते, त्यामुळे आपल्या मनात साशंकता असते. मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीचे त्यांच्या क्षमतांवर चांगले नियंत्रण असते तेव्हा ती निर्भय बनते.

एखादा व्यक्ती स्वतःला सर्वसमावेशक बनवून निर्दोष बनतो. जेव्हा आपण सर्वसमावेशक असतो तेव्हा आपण कधीही काहीही चुकीचे करणार नाही आणि म्हणूनच कोणताही अपराध नाही. जेव्हा आपण स्वतःला अशा प्रकारे समजावतो की आपल्याला फक्त समाधानी वाटेल असं काम करायचं आहे. प्रगती करण्यासाठी दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही तेव्हा आपण लोभमुक्त बनतो.

तुम्ही निर्भय बनला, तुम्ही निर्दोष आहात आणि तुम्ही लोभमुक्त बनतात तर तुम्ही एक परिपूर्ण आणि अद्भुत व्यक्ती बनता. मानवतेचा अर्थ कोणीतरी किंवा सर्व लोक नाही. याचा अर्थ हा (स्वतः) आहे. जर तुम्ही अद्भुत बनला तर बाकी सर्व काही अद्भुत होईल, असं म्हणत सद्गुरुंनी पुन्हा एकदा आपल्या आतील दिवा पेटवण्याचे आवाहन केले आहे.

Follow Us
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.