AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahamrityunjaya Mantra Benefits | शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा

या मंत्राचा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. महामृत्युंज मंत्राचा जप करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Mahamrityunjaya Mantra Benefits | शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा
shiva
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई :  महामृत्युंजय हा सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे. भगवान शिवाचे भक्त ह्या मंत्राचा जप करतात . असे मानले जाते की हा मंत्र नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो. १०८ वेळा मंत्र जप केल्याने व्यक्तीला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. या मंत्राचा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. महामृत्युंज मंत्राचा जप करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

महामृत्युंजय मंत्राचे फायदे

या मंत्राचा रोज जप केल्याने त्यापासून तयार होणाऱ्या कंपनांपासून आजार दूर राहून तुम्ही निरोगी राहू शकता. रोज सकाळी जपमाळ जपल्याने फायदा होतो.

अनेकांना त्यांच्या आयुष्यात काही ना काही कारणाने अडथळे आणि नकारात्मकता जाणवते. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने त्यांना त्यांच्या जीवनावरील कोणत्याही वाईट शक्तींचा किंवा नकारात्मकतेचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

कुटुंबात समस्या असल्यास किंवा कुटुंबात कोणी आजारी असल्यास त्यांच्या नावाने या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, त्यांचे नाव घ्या आणि नंतर नामजप सुरू करा.

ज्योतिष शास्त्रानुसार या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. त्याचा व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

महामृत्युंजय मंत्राचा जप केव्हाही आणि कुठेही करता येतो. सकाळी आंघोळीनंतर त्याचा जप करणे उत्तम. या मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या मणी वापरणे फायदेशीर मानले जाते. चांगल्या परिणामासाठी मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा

तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…

Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.