AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Menstruation | मासिक पाळी दरम्यान पूजा का करत नाहीत? जाणून घ्या नेमकी वैज्ञानिक, शास्त्रीय कारणं

एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तीभावाने उपवास (Fast) केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे, असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील येथे जाणून घ्या तुम्ही काय करु शकता.

Menstruation | मासिक पाळी दरम्यान पूजा का करत नाहीत? जाणून घ्या नेमकी वैज्ञानिक, शास्त्रीय कारणं
Mentrual-Rules-for-Worship
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 10:50 AM
Share

मुंबई :  हिंदू धर्मात (Hindu) मासिक पाळी दरम्यान महिलांसाठी अनेक नियम बनवले आहेत. या नियमांनुसार, स्त्रीला मासिक पाळीत (Menstruation)पूजा करण्यास , मंदिरात जाण्यास मनाई आहे. साठवणीत असलेल्या गोष्टींना हात लावण्यास मनाई करण्यात येते. ज्यामध्ये लोणचं पापड या गोष्टींचा समावेश होतो. पण महिलांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते, ती शक्तीच अपवित्र का मानली जाते? दुसरीकडे, जर एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तीभावाने उपवास (Fast) केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे, असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील येथे जाणून घ्या तुम्ही काय करु शकता.

मासिक पाळी दरम्यान पूजा का निषिद्ध आहे जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या, त्यामागे काही तरी वैज्ञानिक तथ्य होते. पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला नाही, त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रुपांतरण झाले. प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजापद्धती पूर्ण होत नसे. याशिवाय, मोठे विधी केले गेले, ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली गेली. नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते.त्यामुळेच कदाचित या काळात पुजा करण्यास मनाई केली जायची.

का तयार झाले नियम ?

याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते. पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसांत स्वच्छता राखण्याची फारशी साधने नव्हती. त्यामुळे महिलांचे कपडे इत्यादी अनेक वेळा खराब झाले. अशा परिस्थितीत महिलेला विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वत: ची पूर्ण काळजी घेऊ शकते, त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा देण्यात आली. पलंग खराब होऊ नये, यासाठी ती महिला स्वतंत्र पलंग जमिनीवर अंथरुन टाकून झोपायची. पण मानसिक उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते. वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली. पाहिलं तर आजच्या काळात पीरियड्स दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यमं आहेत.

उपवास करताना मासिक पाळी आल्यास काय करावे जरी तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे. पीरियड्सच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही. देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची आहे, शारीरिक शुद्धता त्यानंतर येते. उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता.

मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होत असल्याल ‘हे’ उपाय करा – मासिक पाळीदरम्यान वेदना कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग पोट गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे, जेणेकरून स्नायूंचे आकुंचन कमी होईल.

– हळद दुधासह आपण गुळ, ओवा किंवा सुंठ मिसळून खाऊ शकता. यामुळे खूप विश्रांती मिळेल.

– दिवसभर शक्य असल्यास कोमट पाणी प्यावे. तसेच, ओवा पाण्यात उकळून दोन ते तीन वेळा चहासारखा प्या.

– काही स्त्रिया पाळी दरम्यान भूक लागत नाही किंवा अन्न पोटात जात नाही. यामुळे देखील वेदना आणि पोटातील वायू वाढतात. म्हणून, या काळात अन्न खा आणि शक्य असल्यास व्हिटामिन सी, ई आणि बी असलेला आहार घ्या.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

संबंधीत बातम्या : 

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेले ‘हे’ 5 मंत्र आत्मसात करा, कोणतंही काम चुटकीसरशी पूर्ण होणार

Astro Remedy | लग्न जमत नाही आहे? वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा

23 January 2022 Panchang | 23 जानेवारी 2022, रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.