AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parama Ekadashi 2023 : किती तारखेला साजरी होणार परमा एकादशी? या व्रताने होतो रंकाचाही राजा

या तारखेला परमा एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. अधिकमासातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

Parama Ekadashi 2023 : किती तारखेला साजरी होणार परमा एकादशी? या व्रताने होतो रंकाचाही राजा
एकादशीImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 05, 2023 | 4:18 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एकादशीचे व्रत (Parma Ekadashi 2023)  केले जाते. 12 ऑगस्ट 2023 रोजी परमा एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. अधिकमासातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही, आर्थिक लाभ होतो. पौराणिक कथेनुसार या व्रताच्या महिमामुळे गरीब ब्राह्मणही श्रीमंत झाला. सनातन परंपरेत एकादशी व्रताचे काही नियमही सांगितले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास व्रताचे पूरण फळ प्राप्त होत नाही.

 परमा एकादशी व्रताच्या दिवशी हे नियम पाळा

  1. हे काम सकाळी करू नका – परमा एकादशीचे व्रत केल्याने वर्षभर धार्मिक कृत्ये आणि दानधर्माचे पुण्य मिळते, त्यामुळे या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नका, दुपारीही झोपू नका. आणि उपवासाची रात्र जागून विष्णूजींच्या मंत्रांचा जप करा.
  2. अन्नदान करा – एकादशीच्या दिवशी व्यक्ती, प्राणी किंवा पक्षी घरी आले तर त्यांना काही खाऊ घातल्याशिवाय पाठवू नका. या दिवशी पूर्वज कोणत्याही रुपात तुमच्या दारात येऊ शकतात.
  3. या रंगाचे कपडे घालणे टाळा- या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने काळे कपडे घालण्यास विसरू नये. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे. याचा उपवासावर वाईट परिणाम होतो, उपवासाचे फळ मिळत नाही.
  4. ब्रह्मचार्याचे पालण करा- परमा एकादशी व्रताच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. वासना, क्रोध किंवा मत्सर या भावनांचा त्याग करा, तरच व्रताचे फळ मिळेल.

परमा एकादशीच्या दिवशी या 3 गोष्टी अवश्य करा

  1. परमा एकादशीचे व्रत 3 वर्षांतून एकदा येते, त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ घ्यायचा असेल तर या दिवशी विष्णूजींना पंचामृत, केशरमिश्रित पाण्याने अभिषेक करा.
  2. परमा एकादशी व्रताच्या दिवशी भजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते आर्थिक अडचणी दूर करते, मानसिक तणावापासून आराम देते.
  3. एकादशीच्या दिवशी पिंपळाची पूजा करावी. या दिवशी लक्ष्मी-नारायण पिंपळात वास करतात. 7 परिक्रमा करताना पीपळाच्या झाडाभोवती कच्चे सूत गुंडाळा आणि कुटुंबाच्या सुखासाठी आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करा. हा उपाय खूप प्रभावी आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.