AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : राम मंदिराच्या पुजाऱ्यांचे प्रशिक्षण सैन्यापेक्षाही कठीण! दोन महिन्यातच सोडून गेले उमेदवार

पंडित विठ्ठल यांनी सांगितले की, प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना दररोज पहाटे साडेचार वाजता तयार व्हावे लागते. त्यासाठी त्यांना पहाटे तीननंतरच उठवावे लागते. थंडी असूनही आंघोळ केल्याशिवाय कोणताही उमेदवार प्रशिक्षणाला जाऊ शकत नाही.

Ram Mandir : राम मंदिराच्या पुजाऱ्यांचे प्रशिक्षण सैन्यापेक्षाही कठीण! दोन महिन्यातच सोडून गेले उमेदवार
Ram Mandir
| Updated on: Jan 04, 2024 | 11:18 AM
Share

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येच्या मंदिरात रामललाच्या (Ramlala) प्राणप्रतिष्ठापणेचा भव्य कार्यक्रम आहे. मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह अनेक देशांचे राजदूत सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत प्रभू श्रीरामाच्या नित्य उपासनेसाठी पुजाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. पंडित विठ्ठलजींनी सांगितले की, पुजाऱ्यांना कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. ते म्हणाले की जेव्हा नवीन मंदिर बांधले जात होते. त्या वेळी नवीन प्रकारचे पुजारी आणि नवीन प्रकारचे सेवक यांची गरज होती. त्यासाठी पुजाऱ्यांची भरती करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले.

सूर्योदयापूर्वी उठणे

पंडित विठ्ठल यांनी सांगितले की, प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना दररोज पहाटे साडेचार वाजता तयार व्हावे लागते. त्यासाठी त्यांना पहाटे तीननंतरच उठवावे लागते. थंडी असूनही आंघोळ केल्याशिवाय कोणताही उमेदवार प्रशिक्षणाला जाऊ शकत नाही.

दोघांनी ठोकला रामराम

पुजाऱ्यांच्या नियुक्तीसाठी अर्जाचा प्रश्‍न समोर आला असता, सुमारे तीन हजार अर्ज भरले गेले. यापैकी 24 फॉर्म भरून पूर्ण करून आणि तपासणीनंतर उमेदवार परीक्षेसाठी आले. त्यानंतर त्यांचे कठोर प्रशिक्षण सुरू झाले. यापैकी दोन जणांनी काही कारणांमुळे प्रशिक्षण प्रक्रियेतून बाहेर पडले. सद्यस्थितीत कठोर प्रशिक्षण घेतलेले केवळ 22 उमेदवार शिल्लक आहेत.

जातीचे बंधन नव्हते

देवाची सेवा करण्यासाठी कुठल्याही जातीचे बंधन नाही. सर्वच स्थरातून उमेदवारांना संधी देण्यात आली होती. त्या पैकी दोन एससी आणि एक ओबीसी उमेदवार देखील पुजाऱ्यांच्या चमुमध्ये आहे. ज्या पुजाऱ्यासाठी मुख्य अटी लागू केल्या जातात त्यात या उमेदवारांना श्री रामाची पूजा रामानंदी पंथाच्या प्रथेनुसार करणे अनिवार्य आहे.

पंडित विठ्ठलजींनी सांगितले की, हे 6 महिन्यांचे प्रशिक्षण आहे. प्रशिक्षणाची प्रक्रिया आणखी वाढवता येईल. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत रात्री साडेचार ते साडेआठ पर्यंत, त्रिकाल संध्या, पहाटे, संध्याकाळ, मध्यान्ह आणि ज्या काही परंपरा आहेत त्याला रामानंद पंथाचे पालन करावे लागेल.

यासोबतच उमेदवारांना ब्रह्मचर्य पाळावे लागते. प्रशिक्षण होईपर्यंत पुजाऱ्यांना कुटुंबाशी बोलण्याची परवानगी नाही. या प्रशिक्षणानंतर त्यांना लेखी व तोंडी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातर्फे करण्यात आली आहे. सध्या, मुळात मिथिलेश नंदी शरण आणि सत्यनारायण दास त्यांना प्रशिक्षण देत आहेत. यासोबतच दक्षिणेतून काही पंडितही आले आहेत. ते लोकही येत आहेत आणि त्यांना पूजा पद्धती आणि परंपरांबद्दल काही ज्ञान देत आहेत. सध्या त्यांना ट्रस्टने घोषित केल्यानुसार 2000 रुपये दिले जात आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.