Ramayan Story : पोपटाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते रामापासून विभक्त, अशी आहे पौराणिक कथा

धार्मिक कथांनुसार, बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती. तेवढ्यात त्यांच लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेलं. हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते, जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली. पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे.

Ramayan Story : पोपटाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते रामापासून विभक्त, अशी आहे पौराणिक कथा
राम सीता Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 12:07 PM

मुंबई : रामायण (Ramayana Story) अनेक भाषांमध्ये लिहिले गेले आहे, ज्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आणि कथा सांगितल्या गेल्या आहेत. यापैकी एक कथा माता सीता भगवान श्री राम यांच्यापासून विभक्त झाल्याबद्दल आणि माता सीतेला पतीपासून विभक्त होण्याचे कारण सांगितली जाते. धार्मिक कथांनुसार असे म्हटले जाते की माता सीता लहान असताना तिने चुकून एका मादी पोपटाला पकडले होते. त्यामुळे त्याचा नर पोपट दुःखी झाला आणि त्याने माता सीतेला शाप दिला. या पौराणिक कथेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पोपटाने सीतेला शाप का दिला?

धार्मिक कथांनुसार, बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती. तेवढ्यात त्यांच लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेलं. हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते, जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली. पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे. तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि राजा जनकाची कन्या राजकुमारी सीता हिच्याशी त्याचा विवाह होईल.

पोपटांच्या जोडीकडून स्वत: बद्दल ऐकून, माता सीता आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे आली आणि पोपटांच्या जोडीला म्हणाली की ज्या राजकुमारी सीताबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात तीच जनकाची कन्या सीता आहे. तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे कळले? तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात. महर्षि वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकत असू.

हे सुद्धा वाचा

आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने, माता सीतेने पोपटांची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, जी पोपटांनी नाकारली. माता सीता आपल्या आग्रहावर ठाम राहिली आणि त्यांनी दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी मादी पोपट सीतामातेच्या हाती पकडली गेली.

माता सीता आणि भगवान श्री राम यांच्या विभक्त होण्याचे कारण शाप कधी बनले?

आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी, पोपटाने माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती, परंतु माता सीता त्यावेळी लहान होती. त्यामुळे त्यांनी नकार दिला. तेव्हा नर पोपटाने माता सीतेला शाप दिला की जसे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले आहे, त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून वेगळे होणे तुलाही सहन करावे लागेल. असे बोलून नर पोपटाने प्राण सोडले. पोपटाच्या शापामुळे माता सीतेला प्रभू श्रीरामापासून वेगळे व्हावे लागले असे म्हटले जाते. ही एक पौराणिक कथा असली तरी ती रंजक आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.