AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramzan 2022 : सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आहारात या गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ऊर्जा राहील!

रमजान (Ramzan 2022) हा अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात जवळपास महिनाभर रोजे करून अल्लाहची पूजा केली जाते. रमजानचा चंद्र दिसताच हा महिना सुरू होतो. या महिन्यात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दुसऱ्या दिवशी रोजे (Roza) करतात. नमाज व्यतिरिक्त सेहरी आणि इफ्तारलाही रमजान महिन्यात विशेष महत्त्व आहे.

Ramzan 2022 : सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आहारात या गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ऊर्जा राहील!
रमजानदरम्यान आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा आहारात समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 2:30 PM
Share

मुंबई : रमजान (Ramzan 2022) हा अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात जवळपास महिनाभर रोजे धरले जातात. रमजानचा चंद्र दिसताच हा महिना सुरू होतो. या महिन्यात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दुसऱ्या दिवशी रोजे (Roza) करतात. नमाज व्यतिरिक्त सेहरी आणि इफ्तारलाही रमजान महिन्यात विशेष महत्त्व आहे. रमजानमध्ये सूर्य उगवण्यापूर्वी खाल्ले जाते आणि यालाच सेहरी म्हणतात, सेहरीनंतर दिवसभर काहीही खाल्ले (Food) जात नाही. सूर्यास्तानंतर खजूर खाऊन रोजा सोडला जातो, त्याला इफ्तार म्हणतात. रमजानमध्ये कमी खाण्या-पिण्याने शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता भासू शकते, परंतु सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी राहते आणि अशक्तपणा किंवा थकवा वगैरे येत नाही.

सेहरी दरम्यान या गोष्टी खा 

-सेहरीनंतर सूर्यास्तापर्यंत काहीही खायचे किंवा प्यायचे नसते, यामुळे सेहरीमध्ये अधिकाधिक आरोग्यदायी अन्नाचा समावेश करावा. तुमच्या आहारात अधिकाधिक फायबरयुक्त आहाराचा समावेश करा, यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. यासाठी तुम्ही सफरचंद, नाशपाती, बीन्स, कडधान्य इत्यादी खाऊ शकता.

-सेहरीच्या वेळी दही जरूर खावे. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील. याशिवाय कच्चे चीज आणि दूध घेतल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला पोषणही मिळते. सेहरीच्या अर्धा तास आधी पाणी प्या आणि नंतर जेवण सुरू करा. जेणेकरून दिवसभर शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

इफ्तारच्या वेळी या गोष्टी खा

-इफ्तारची सुरूवात खजूरने केली जाते. असे मानले जाते की खजूर पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या आवडत्या पदार्थ होता. खजुरपासून शरीराला झटपट ऊर्जा मिळते. हे दिवसभरातील कमजोरी दूर करण्याचे काम करते.

-रस, नारळ पाणी घ्या. याशिवाय मसालेदार पदार्थांऐवजी हलक्या, पचायला हलक्या भाज्या खाव्या ज्या सहज पचतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात. जेवणासोबत सॅलड जरूर खावे. अन्न खाल्ल्यानंतर थोडा वेळ फिरा, मगच विश्रांती घ्या.

संबंधित बातम्या : 

Zodiac | या राशींचे भाग्य आज उजळणार, हे होतील मोठे फायदेच फायदे!

Chaitra Navratri : 51 शक्तीपीठांपैकी एक हिंगलाज शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये, ‘नानी का हज’ म्हणून प्रसिद्ध!

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.