AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनुष्यजन्मातील पाप किंवा पुण्यच ठरवते स्वर्ग की नरकात जागा मिळणार? जाणून घ्या कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा मिळते?

आपल्या पदाचा गैरवापर करून निरापराध्यांचा छळ करणाऱ्या लोकांना वैतरणी नदीचे कष्ट भोगावे लागतात. असे मानले जाते की या नदीमध्ये मानवी शरीरे, त्यांची कवटी, सांगाडे आणि रक्त, पू आणि इतर घाणेरड्या गोष्टी असतात.

मनुष्यजन्मातील पाप किंवा पुण्यच ठरवते स्वर्ग की नरकात जागा मिळणार? जाणून घ्या कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा मिळते?
गरुड पुराणात धनाचा संबंध स्वच्छतेशी सांगताना सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी असे वाटत असेल तर घरासोबतच शारीरिक स्वच्छतेकडेही पूर्ण लक्ष द्या. जिथे घाण असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. हे जरी शास्त्रोक्त पद्धतीने बघितले तरी ते अगदी बरोबर असल्याचे सिद्ध होते कारण जिथे घाण असते तिथे रोग आणि नकारात्मकता असते. अशा ठिकाणी पैसा पाण्यासारखा वाया जातो आणि त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे त्रास होतो.
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 3:32 PM
Share

मुंबई : गरुड पुराणाला सनातन धर्मामध्ये महापुराण असे नाव देण्यात आले आहे. याद्वारे लोकांना वाईट कृत्य सोडून चांगले जीवन जगण्यासाठी धर्माच्या मार्गाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला आहे. गरुड पुराणात योग्य आणि चुकीच्या कर्मांचे देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याआधारे असे सांगितले आहे की मृत्यूनंतर त्या व्यक्तीला कोणत्या पापासाठी शिक्षा मिळते, त्याआधारे असे सांगितले आहे. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर स्वर्ग कि नरक मिळणार हे त्या व्यक्तीच्या कर्मावर आधारलेले असते. (The sin or virtue of human birth decides whether there will be a place in heaven or hell)

1. असे मानले जाते की, ज्यांनी दुसऱ्याचे पैसे लुटले आहेत, त्यांना नरकामध्ये यमदूत दोरीने बांधून इतका मारतो की मारहाण झाल्यावर ती व्यक्ती बेशुद्ध पडते. त्यातून पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा मारहाण केली जाते.

2. जे आपल्या वडिलांचा अपमान करतात किंवा त्यांना घराबाहेर हाकलतात, त्या पापींना नरकात अग्नीमध्ये बुडवले जाते. अशा व्यक्तींची त्वचा काढून टाकेपर्यंत ही शिक्षा दिली जाते.

3. जे लोक आपल्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांना मारतात त्यांना नरकात खूप कठोर शिक्षा मिळते. अशा पापी लोकांना मोठ्या भांड्यात गरम तेल टाकून तळले जाते.

4. एकमेकांच्या परिस्थितीचा फायदा घेणारे पती-पत्नी एकमेकांच्या पैशाचा फायदा घेईपर्यंतच त्यांच्याबरोबर जगतात, अशा लोकांना नरकात लोखंडी रॉडने मारहाण केली जाते.

5. जे लोक स्वत:च्या आनंदासाठी इतरांचे आनंद काढून घेतात. इतरांची संपत्ती हडप करतात, अशा लोकांना सापांनी भरलेल्या विहिरीत ढकलले जाते.

6. ज्यांचे पती किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत, त्यांच्या अंगावर जळत राहणारा लोखंड टाकला जातो आणि त्यांना मारहाण केली जाते.

7. जे लोक प्राण्यांचे बलिदान देऊन त्यांचे मांस खातात अशा लोकांना नरकात आणले जाते आणि त्यांना प्राण्यांमध्ये सोडले जाते. ते सर्व प्राणी त्यांना फाडून टाकतात आणि खातात.

8. जे पुरुष स्त्रियांवर बलात्कार करतात किंवा महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवून त्यांची फसवणूक करतात. अश लोकांना नरकातही प्राण्यांसारखेच वागवले जाते. त्यांना मलमूत्र आणि मूत्राने भरलेल्या विहिरीत फेकले जाते.

9. आपल्या पदाचा गैरवापर करून निरापराध्यांचा छळ करणाऱ्या लोकांना वैतरणी नदीचे कष्ट भोगावे लागतात. असे मानले जाते की या नदीमध्ये मानवी शरीरे, त्यांची कवटी, सांगाडे आणि रक्त, पू आणि इतर घाणेरड्या गोष्टी असतात.

10. जे लोक जबरदस्तीने साध्या लोकांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात. अशा लोकांना बरेच धोकादायक प्राणी आणि साप असलेल्या विहिरीत फेकले जाते. (The sin or virtue of human birth decides whether there will be a place in heaven or hell)

इतर बातम्या

Maharashtra Flood : महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती, लेप्टो, डेंग्यूसह अन्य आजार पसरु नये म्हणून मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

झारखंडचं सरकार पाडण्याच्या कटात चंद्रशेखर बावनकुळेंचा हात?; बावनकुळे म्हणतात…

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.