AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Aashadhi Ekadashi: अशाप्रकारे घरच्याघरी करा आषाढी एकादशीची पूजा; विधी आणि महत्त्व

आज आषाढी एकादशी (Today Aashadhi Ekadashi) आहे. गेल्या आळंदी, देहू, शेगाव अशा ठिकठिकाणाहून वारकरी (Pandharpur wari 2022) विठू माऊलीच्या दर्शनासाठी (vitthal darshan) काल पंढरपुरात दाखल झाले. आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नागरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या विठुरायाच्या दर्शनाची आस लावून मजल दर मजल करत पंढरपूर जवळ करणाऱ्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच […]

Today Aashadhi Ekadashi: अशाप्रकारे घरच्याघरी करा आषाढी एकादशीची पूजा; विधी आणि महत्त्व
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 10, 2022 | 5:10 AM
Share

आज आषाढी एकादशी (Today Aashadhi Ekadashi) आहे. गेल्या आळंदी, देहू, शेगाव अशा ठिकठिकाणाहून वारकरी (Pandharpur wari 2022) विठू माऊलीच्या दर्शनासाठी (vitthal darshan) काल पंढरपुरात दाखल झाले. आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नागरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या विठुरायाच्या दर्शनाची आस लावून मजल दर मजल करत पंढरपूर जवळ करणाऱ्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लावली आहे. कोरोनाकाळात दोन वर्ष विठुरायाचे दर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढी एकादशीला अनेकांनी आवर्जून पंढरपूरला हजेरी लावली आहे. याशिवाय तुमच्या आमच्या सारखा एक मोठा वर्ग घरूनच विठुरायाचे स्मरण करीत आहे. आषाढी एकादशी निमित्त आपण घरच्या घरी पूजा करून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊ शकतो.

आजच्या दिवशी हा संपूर्ण उपवास करायचा असतो. उपवासाचे पदार्थ किंवा फळं खायला काही हरकत नाही. स्नान आदी आटोपून घरच्या देवाची पूजा करावी. घरी विठूरायाची मूर्ती असल्यास तिला पंचामृताने स्नान घालावे. मूर्ती व्यवस्थित पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावावा.

मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करावे. हार घालावा. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि विठूरायाची आरती करावी. या दिवशी तुळस तोडू नये. आजपासून चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात.

या चार महिण्यासाठी सृष्टीचा भार भगवान शंकर सांभाळत असतात. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना करावी. त्यानंतर काहीच दिवसात श्रावणास प्रारंभ होतो. श्रावण महिना (Sawan Month) हा पावसाचा महिना असतो. पावसाळा संपल्यानंतर शरद ऋतुचे आगमन होते. म्हणजेच चातुर्मासात ऋतूत बदल होत असतात. ऋतुबदलानुसार आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार पसरतात. सर्व भाज्या, फळे यांमध्ये बॅक्टेरिया आणि किड लागते. पावसामुळे सामान्य जनजीवन थोडे विस्कळीत होते आणि गृहकेंद्रित होते. या सर्व कारणांमुळेच या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य करत नाहीत, खाण्या-पिण्याची काळजी घेण्याचा आणि सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके