AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : धनलाभ आणि कर्जमुक्तीसाठी करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय

घरात सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक मोठं आर्थिक संकट येतं, अशावेळी माणूस कर्जबाजारी बनतो. या कर्जातून सुटका होण्यासाठी आणि धनलाभासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : धनलाभ आणि कर्जमुक्तीसाठी करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 8:52 PM
Share

वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन मुख्य तत्वावर काम करतं, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की एखादं मोठं आर्थिक संकट किंवा काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच अनेकदा असं देखील घडलं की आपण खूप पैसा कमावतो, मात्र हातात पैसा टिकत नाही, तसेच कर्जाचं देखील आहे, आपण कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते फिटत नाही, आपण जेवढं कर्ज फेडतो, तेवढं ते वाढतच जातं. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करणं गरजेचं असतं. धनलाभ आणि कर्जातून मुक्तीसाठी वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वास्तुदोष नष्ट होतो. वास्तुदोष नष्ट झाल्यास तुमच्या मागची संकट आपोआप कमी होतात. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

गुरूवारी करायचे उपाय – जर तुमच्यावर कर्ज आहे, ते फिटत नाही, तर अशा स्थितीमध्ये दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. तसेच दर गुरूवारी हरभाऱ्याची डाळ आणि गूळ या सारख्या पिवळ्या वस्तू आणि पिवळं फूल भगवान विष्णू यांना अर्पण करावं, त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तुमची सर्व प्रकारच्या कर्जातून सुटका होते.

कधी-कधी घरात शनीदोष देखील निर्माण होतो. शनिदोष निर्माण झाल्यास तुमच्या कार्यात अडथळे येऊ लागतात. हातात पैसा टिकत नाही. अशा स्थितीमध्ये शनी देव यांना प्रसन्न करण्यासाठी दर शनिवार शनी मंदिरात जाऊन शनी देवांची पूजा करा, शनी देवांना तेल अर्पण करा, तसेच शनिवारी गरजू व्यक्तींना दान करा, काळ्या तिळाचं दान करणं देखील शुभ मानलं जातं, यामुळे घरातील सर्व इडापिडा शनी महाराजांच्या कृपेनं दूर होते.

दर मंगळवारी कुंकवामध्ये तेल मिसळून त्याचं नारळावर स्वस्तिक काढा आणि हे नारळ भगवान हनुमानांना अर्पण करा. प्रार्थना करा यामुळे तुमच्या घराचं प्रत्येक वाईट गोष्टींपासून संरक्षण होतं. हुनमानांची कृपा सदैव तुमच्या घरावर राहते, आणि घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.