AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागली आहे हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सोपे उपाय

जर एखाद्या व्यक्तीला किंवा घराला नजर लागली तर त्यामध्ये अनेक नकरात्मक बदल दिसू लागतात, नजर लागने म्हणजे नेमकं काय? आणि ही समस्या कशी दूर करायची? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Shastra : तुम्हाला किंवा तुमच्या घराला नजर लागली आहे हे कसं ओळखायचं? जाणून घ्या सोपे उपाय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 5:36 PM
Share

असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीला किंवा घराला कोणाची नजर लागली तर त्यावेळी संबंधित व्यक्तीमध्ये काही बदल दिसू लागतात जसं की, शारीरिक आणि मानसिक समस्या, अचानक तीव्र डोके दुखी, चक्कर येणं, स्वभाव चिडचिडा होणं, झोप न येणं, थकवा जाणवणं, असे अनेक लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. नजर फक्त व्यक्तीलाच लागते असं नाही तर घराला देखील लागू शकते, जर घराला नजर लागली तर अचानक व्यापारामध्ये मोठं नुकसान होणं, आर्थिक समस्या निर्माण होणं, घरात कायम वादविवाद भांडणं होणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात, नजर लागली तर त्यावर काय उपाय करावेत? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे, ती आज आपण जाणून घेणार आहोत.

अशी दूर करा नजर

जर तुम्हाला किंवा घराला कोणाची नजर लागली असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय करू शकता. सायंकाळच्या वेळी काही लवंगा, कापूर आणि एक शेणाची गवरी घ्या, तसेच मोहरीचं तेल देखील सोबत घ्या, या गवरीवर मोहरीचं तेल टाकून ती गवरी पेटवा, त्यामध्ये कापूर आणि लवंगा टाका आणि त्याचा जो धूर होईल, तो संपूर्ण घरात फिरवा. वास्तुशास्त्रानुसार असा उपाय केल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होतं. जर तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल तर त्याचं मुख्य लक्षण असतं, की घरामध्ये सतत भांडणं होतात, कारण नसताना वादविवाद होतात, मात्र तुम्ही जर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, घर स्थिर आणि शांत राहील.

अशी दूर करा घरातील नकारात्मक ऊर्जा

जर तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, घरामध्ये सतत भांडणं होत राहतात, कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नाही? आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत? तर त्यामागे वास्तुदोष असू शकतो, असा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरातील देवघरासमोर एक कापूर लावा, दररोज कापूर लावल्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुम्हाला त्याचा अपेक्षित प्रभाव देखील पहायला मिळतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार झाली असेल तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात, मात्र छोट्या-छोट्या उपायांद्वारे आपण घरातील वास्तुदोष नष्ट करू शकतो, जसं की घर कायम स्वच्छ ठेवा, उत्तरेला लक्ष्मी माता किंवा कुबेराचा फोटो ठेवा, यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होणार नाहीत. तुमच्या देवघराचं द्वार हे नेहमी पूर्वेला किंवा पश्चिमेला ठेवा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.