AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय

हिंदू धर्मशास्त्रामध्ये कापराला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. आपण दररोज देवपूजेवेळी घरात कापूर लावतो. घरात दरोज कापूर लावल्यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज आपण कापराचे असेच काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
CamphorImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 9:07 PM
Share

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये कापराला मोठं महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर नित्यनियमाने दररोज घरात कापूर लावला तर सर्व प्रकारचे वास्तुदोष त्यामुळे दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर शुभ प्रभाव पडतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभते. अनेकांच्या आयुष्यात अडचणी असतात. खूप कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही. अनावश्यक गोष्टींवरील खर्च वाढतो, तसेच तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर ते तुम्ही कितीही फेडायचा प्रयत्न केला तरी देखील ते काही फिटत नाही. उलट कर्ज वाढतच जातं, अशा अनेक प्रकारच्या समस्या तुम्ही कापराच्या सोप्या उपायांनी दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळा – वास्तुशास्त्रानुसार या सोप्या उपायामुळे तुमच्या आसपास जेवढी काही नकारात्मक ऊर्जा असते, ती नष्ट होते. तुम्हाला शांत झोप लागते. तसेच तुमचं मन देखील शातं होतं.

शुक्रवारी कापूर आणि लवंग एकत्रित जाळा – जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त आहात, हातात पैसा टिकत नाही. डोक्यावर कर्ज झालं आहे. तर हा उपाय तु्मच्यासाठीच आहे. दर शुक्रवारी कापूर आणि काही लंवगा एकत्र करून त्यांना जाळा. यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. लक्ष्मीत मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या सर्व संकटांचा नाश होतो. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

कापूर आणि मनी प्लांट – कितीही कष्ट केले, कितीही पैसे कामावले तरी देखील तुमच्या हातात पैसे उरत नसतील. घरात खर्च वाढला असेल, पैशांची बत होत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुमच्या घरातील मनी प्लांट जवळ कापूर ठेवा, यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल.

धन प्राप्तीसाठी – जर तुमच्या घरातील धनाची आवक ठप्प झाली असेल, तर अशावेळी घरात धनाची आवक वाढण्यासाठी दररोज सकाळी अंघोळीनंतर घरात कापूर जाळा यावेळी महालक्ष्मी मातेच्या स्त्रोताचं पठण किंवा मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

कापराची आरती – जर तुम्हाला शनी दोष किंवा शनीासाडेसातीचा त्रास असेल तर दर शनिवारी कापराची आरती करा, यामुळे शनी देव प्रसन्न होतात, आणि सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.