AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय

अनेकदा आपण खूप पैसा कमावतो, परंतु तो कमीच पडतो. घरात कायम आर्थिक समस्या येत राहतात. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 04, 2026 | 8:58 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण प्रचंड पैसा कमावतो, मात्र पैसा घरात टिकत नाही. आपण कितीही पैसा कमावला तरी देखील तो कमीच पडतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. जर आपण एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल ते देखील कमी न होता वाढतचं जातं. अशा स्थितीमध्ये काय करावं? असा अनेकांना प्रश्न पडतो. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे योग्य आर्थिक नियजोन, अनावश्यक बाबींवर पैसा खर्च न करणं आणि पैशांची योग्य गुंतवणूक. हे झाले आर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून उपाय. परंतु या उपायांनाच जर अध्यात्माची जोड मिळाली तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचं फळ डबल मिळू शकतो. आज आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्यावर जर कर्ज असेल तर तुम्ही लवकरच कर्जमुक्त व्हाल एवढंच नाही तर तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य देखील लाभेल आणि तुमच्या सर्वा प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील.

वास्तुशास्त्रानुसार घरात लाल मुंग्या निघणं हे अतिशय शुभ असतं. अनेकजण या मुंग्यांना मारून टाकतात. पंरतु वास्तुशास्त्रानुसार जर घरात अशा मुंग्या निघत असतील तर तो तुमच्यासाठी अकस्मात धनाचा योग असतो. त्यामुळे या मुंग्यांना कधीही मारलं नाही पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं. कधी जर तुमच्या घरात अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना न मारता पिठाच्या कणकेचे छोटे-छोटे गोळे करा, त्यामध्ये थोडा गूळ मिक्स करा आणि हे अन्न मुंग्यांना खायला द्या. यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होतील असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हा प्रयोग तुम्ही दररोज केला तर तुमच्या घरातील सर्व प्रकाच्या आर्थिक समस्या हळुहळु नष्ट होतील आणि तुमची तिजोरी पैशांनी भरून जाईल.

घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वाची असते, कारण ही दिशा धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे. घराची ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच तुमच्या घरात उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेरांचा एखादा फोटो लावा किंवा तुमच्या घरातील देवघरात लक्ष्मी माता आणि कुबेर यांची प्रतिमा ठेवावी. लक्ष्मी मातेला धनाची देवता म्हटलं जातं. ज्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, त्या घरात कधीही पैशांची कमी नसते. त्यामुळे नित्यनियमाने सकाळी अंघोळीनंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी. यामुळे तुमच्या घराला आर्थिक स्थैर्य लाभेल, घरात सुख शांती येईल आणि तुमची भरभराट होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.