AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : जेवताना कधीच करू नका ही चूक, अन्यथा पश्चाताप कराल…

वास्तुशास्त्रामध्ये जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडलेला आहे, आपण अन्नाचं सेवन करतो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, मात्र जेवण करताना अशा काही गोष्टी असतात ज्याचं पालन न कल्यास सकारात्मक ऊर्जेचं परिवर्तन हे नकारात्माक ऊर्जेमध्ये होतं. जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : जेवताना कधीच करू नका ही चूक, अन्यथा पश्चाताप कराल...
foodImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 26, 2026 | 8:04 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडला गेलेला आहे, म्हणजे आपण जे काही जेवण करतो, त्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र अनेकजण जेवताना योग्य त्या नियमांचं पालन करत नाहीत, चुकीच्या पद्धतीने जेवतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर विविध समस्या निर्माण होतात. जसं की घरावर कर्ज वाढतं, काहीही कारण नसताना भांडणं होतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे असे वास्तुदोष टाळण्यासाठी योग्य पद्धतीने जेवणं करणं गरजेचं असतं. वास्तुशास्त्रात असं देखील म्हटलं आहे की, आपण कोणत्या प्रकारचं अन्न सेवन करतो? त्यावर आपला स्वभाव देखील अवलंबून असतो. चला तर मग जाणून घेऊयात जेवताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?

वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीने कधीही एका ताटामध्ये जेवू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात गृहकलह वाढतो. वास्तुशास्त्रानुसार कुंटुबातील प्रत्येक व्यक्तीची एक जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असते, घरातील जो कुटुंब प्रमुख असतो, त्याच्यावर आपल्या पत्नीसोबतच घरातील सर्व सदस्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते. अशा परिस्थितीमध्ये जर कुटुंब प्रमुख आणि त्याची पत्नी जर एका ताटात जेवले तर अशा वेळी कुटुंब प्रमुखाचं त्याच्या पत्नीवर असलेलं प्रेम तर वाढतं, मात्र कुटुंबातील इतर सदस्यांकडे त्याचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वाद विवाद होतात, भांडणं होतात. त्यामुळे कधीही पत्नीसोबत एका ताटात जेवू नये, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

ज्या प्रमाणे पती आणि पत्नीने एका ताटात जेऊ नये, त्याचप्रमाणे कधीही बेडवर बसून सुद्ध जेवू नये, असं केल्यास तो अन्नाचा अपमान समजला जातो, त्यामुळे घरात अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण होतात. तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात देखील सापडू शकता, घरात बरकत राहत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश