AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : बेडरूमशी संबंधित या तीन चूक कधीही करू नका, अन्यथा आयुष्यातील सुख, शांती होऊ शकते गायब

आपण कामावरून थकून घरी आल्यानंतर बेडरूम हे आराम करण्याचं आपलं हक्काचं स्थान असतं. बेडरूममध्ये आपला सर्वात जास्त वावर असतो, वास्तुशास्त्रानुसार बेडरूमशी संबंधित अशा काही चुका आहेत, ज्या करता कामा नये, अन्यथा त्याचा प्रभाव हा तुमच्या मानावर पडू शकतो.

Vastu Shastra : बेडरूमशी संबंधित या तीन चूक कधीही करू नका, अन्यथा आयुष्यातील सुख, शांती होऊ शकते गायब
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 2:27 PM
Share

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर होऊ शकते? यासाठी देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जेव्हा कामावरून थकून घरी येता, तेव्हा तुमच्यासाठी आराम करण्याचं तुमचं हक्काचं ठिकाण म्हणजे बेडरूम असतं. तुम्ही दिवसभरातून अधिक काळ हा बेडरूममध्येच व्यतीत करतात, त्यामुळे तुमच्या बेडरूममध्ये जशी ऊर्जा असेल तसा तिचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. जर तुमच्या बेडरूममध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव हा तुमच्या मनावर पडतो, तुमची प्रगती होते, मनाला शांती लाभते. झोपेतून उठल्यानंतर तुम्ही दिवसभर फ्रेश असता, तुमचा दिवस देखील चांगला जातो.

या उलट तुमच्या बेडरूममध्ये जर निगेटीव्ह ऊर्जा असेल तर त्याचा देखील तुमच्या मानावर परिणाम होतो. तुमच्या मनाची दिवसभर चिडचिड होते. तुमचा दिवस चांगला जात नाही, कामात लक्ष लागत नाही, महत्त्वाची काम खोळंबतात. त्यामुळे बेडरूममध्ये निगेटीव्ह ऊर्जा निर्माण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं.  त्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

स्वच्छता – तुमची बेडरूम नेहमी स्वच्छ असावी, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, झोपेतून उठल्यानंतर अंथरूणाच्या नीट घड्या घालाव्यात, कपडे बेडवर अस्त-व्यस्त स्वरुपात पडलेले नसावेत. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जड सामान – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडखाली कधीही जड किंवा लोखंडी सामान असू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, मनात अस्वस्थता वाढते. दिवसभर चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

जेवण – वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कधीही जेवण करू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा फटका हा तुम्हाला बसू शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून...
तुम्ही पाहिलं का? राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी रोहित पवारांकडून जोरदार बॅनरबाजी
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर इस्कॉन...
अजित पवारांच्या अपघाताबाबतचा अजब दावा केल्यानंतर...  इस्कॉनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?