AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर

अनेकदा असं होतं की आपल्या घरात काहीही कारण नसताना वाद होतात, घरातील वातावरण नकारात्मक बनतं. तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो हातात टिकत नाही. यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही सोप्या उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 9:03 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण प्रचंड कष्ट करतो, खूप पैसे कमावतो परंतु हातात पैसा टिकत नाही. हातात जसे पैसे येतात तसे ते खर्च होतात. घरात बरकत राहत नाही, आर्थिक स्थैर्य लाभत नाही. या सर्व प्रकारच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय जर तुम्ही दररोज केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. पूर्वीच्या काळी अनेकजण हे उपाय करत होते, त्यामुळे त्या काळात पैसा कमी होता, मात्र आर्थिक बरकत होती. लोक सुखी समाधानी होते. परंतु आता हातात प्रचंड पैसा येतो, मात्र तो टिकत नाही. लोक सुखी समाधानी असलेले दिसून येत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठल्या नं कुठल्या गोष्टीचा तणाव दिसून येतो. यासाठीच वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

हळदीचा उपाय – स्वयंपाक घरात तुम्ही ज्या डब्यामध्ये तांदूळ ठेवता, त्या डब्यात तीन हळकुंड ठेवा. यामुळे जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरू कमजोर असेल तर तो मजबूत होईल. गुरूची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमचे सर्व कष्ट दूर होतील. तसेच जर घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होत असतील तर ती देखील समस्या दूर होईल.

दिवा – सकाळी तुम्ही जेव्हा देवपूजा करता त्यावेळी स्वंयपाक घरात देखील एक दिवा ठेवा, यामुळे घरात बरकत येते, अन्नधान्य कधीही कमी पडत नाही. अन्नपूर्णा मातेचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतो. तसेच कुठेही दिवा लावता एक विशेष काळजी घेतली पाहिजे, दिवा कधीही जमिनीवर लावू नका, तर दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवा. किंवा एखादं फूल ठेवा, तुम्ही एखाद्या ताटलीमध्ये ठेवून देखील दिवा लावू शकता. यामुळे घरात पैशांची आवक वाढते.

जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. एक काचेचे भांडं घ्या, त्यामध्ये थोडं मीठ आणि लवंगा ठेवा, यामुळे सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

तुम्ही ज्या डब्यामध्ये पीठ ठेवता, त्या डब्यामध्ये दर शनिवारी थोडे हारभारे ठेवा, यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.