AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : उंबरठा पूजन का करावं? काय आहेत फायदे? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रामध्ये उंबरठा पूजनाला विशेष महत्त्व आहे. उंबरठा पूजनामुळे बाहेरची कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही, तसेच कुटुंबातील सदस्यांचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होतं. ज्या घरात उंबरठा पूजन होतं, त्या घराला आर्थिक बरकत लाभते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Vastu Shastra : उंबरठा पूजन का करावं? काय आहेत फायदे? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 29, 2026 | 9:26 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी याच गोष्टी सांगण्यात आलेल्या नाहीयेत, तर तुमच्या घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करायचे? त्याचे उपाय देखील सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच एका उपायाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक घरात उंबरठा पूजन केलं जातं. उंबरठा पूजन करणं हे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानलं जातं, परंतु तुम्हाला माहितीये का? उंबरठा पूजन नेमकं कसं आणि का केलं जातं? त्याचे नेमके फायदे काय आहेत? आज आपण या साऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली असेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव हा तुमच्यासह तुमच्या घरातील इतर सदस्यांवर पडतो.  नाकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी उंबरठा पूजन केलं जातं.

अनेकदा आपल्यासोबत अशा घटना घडतात ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. अनेकदा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. तसेच आर्थिक समस्या निर्माण होतात. तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही. हे सर्व तुमच्या घरात निर्माण झालेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो. उंबरठा पूजनामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून तुमचं आणि तुमच्या घराचं संरक्षण होतं.

उंबरठा पूजन कसं करायचं?

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही दररोज सकाळी किंवा सांयकाळच्या वेळी उंबरठा पूजन करू शकता. सर्व प्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या, त्यानंतर तो गायीच्या शेणाने सारून घ्या, किंवा ते शक्य नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद टाका, या पाण्याने तुमच्या घराचा उंबरा पुसून घ्या, तसेच दररोज सायंकाळी न चुकता तुमच्या उंबऱ्या शेजारी दिवा लावा. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?