AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरतात, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता असते.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 8:20 PM
Share

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्राचं खूप महत्त्वच असतं. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर नशीबाची साथ मिळत नाही, एवढंच नाही तर हातात आलेला पैसा देखील टिकत नाही. मात्र तुम्ही जर दररोज वास्तुशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन केलं, तसेच काही सोपे उपाय केले तर वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जेपासून तुमचा बचाव होऊ शकतो. अनेकदा घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्यविषयक, मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला नशीबाची देखील साथ मिळत नाही, तुमच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे येण्यास सुरुवात होते. दरम्यान हे असं का होतं? आणि त्यावरील उपाय काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपू नका – वास्तुशास्त्रानुसार कधीही पैशांचं पाकिट डोक्याजवळ ठेवून झोपू नये, यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे एखादं पुस्तक किंवा वर्तमानपत्र देखील डोक्याजवळ ठेवून झोपू नका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्याचा परिणाम तुमच्या मानसिक शांतीवर होतो. एवढंच नाही तर घड्याळ, मोबाईल या सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील डोक्याजवळ ठेवून झोपू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

अशा ठिकाणी तुमचं घर कधी असू नये, जिथे तुमच्या अगदी घराच्या समोरच मंदिर असेल, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. तसेच घरात कधीही काटेरी झाडं लावू नयेत, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो. अनेकदा घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराचा मुख्य दरवाजा कधीही बाहेरच्या बाजुने उघडू नका, घराचा मुख्य दरवाजाची रचना अशीच ठेवावी की तो आतील बाजूस उघडेल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.