AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरतात, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता असते.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 8:20 PM
Share

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्राचं खूप महत्त्वच असतं. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर नशीबाची साथ मिळत नाही, एवढंच नाही तर हातात आलेला पैसा देखील टिकत नाही. मात्र तुम्ही जर दररोज वास्तुशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन केलं, तसेच काही सोपे उपाय केले तर वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जेपासून तुमचा बचाव होऊ शकतो. अनेकदा घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्यविषयक, मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला नशीबाची देखील साथ मिळत नाही, तुमच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे येण्यास सुरुवात होते. दरम्यान हे असं का होतं? आणि त्यावरील उपाय काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

या गोष्टी डोक्याजवळ ठेवून झोपू नका – वास्तुशास्त्रानुसार कधीही पैशांचं पाकिट डोक्याजवळ ठेवून झोपू नये, यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे एखादं पुस्तक किंवा वर्तमानपत्र देखील डोक्याजवळ ठेवून झोपू नका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्याचा परिणाम तुमच्या मानसिक शांतीवर होतो. एवढंच नाही तर घड्याळ, मोबाईल या सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील डोक्याजवळ ठेवून झोपू नये. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

अशा ठिकाणी तुमचं घर कधी असू नये, जिथे तुमच्या अगदी घराच्या समोरच मंदिर असेल, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. तसेच घरात कधीही काटेरी झाडं लावू नयेत, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्याचा परिणाम हा पती-पत्नीच्या नात्यावर होतो. अनेकदा घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराचा मुख्य दरवाजा कधीही बाहेरच्या बाजुने उघडू नका, घराचा मुख्य दरवाजाची रचना अशीच ठेवावी की तो आतील बाजूस उघडेल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.