AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात चुकूनही ठेवू नका या 5 वस्तू, नाहीतर व्हाल बरबाद

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला मोठं महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, त्या चुकूनही घरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो, त्या वस्तू कोणत्या आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.

Vastu Tips : घरात चुकूनही ठेवू नका या  5 वस्तू, नाहीतर व्हाल बरबाद
| Updated on: Jul 21, 2025 | 9:36 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या वास्तुची रचना कशी असावी? घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा? घराचा दरवाजा कोणत्या दिशेला नसावा? स्वंयपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कशी असावी अशा एकना अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

मात्र वास्तुशास्त्र केवळ तुमच्या घराच्या रचनेपुरतचं मर्यादीत नाहीये, तर वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक लाहन, मोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचा संबंध हा त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीशी येत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या घरामध्ये काय असावं? काय असू नये? घरात कोणत्या मूर्ती असणं शुभ आहे, कोणत्या मूर्ती अशुभ आहेत, घड्याळाची दिशा कोणती असावी, तुमच्या घरात जर देवी देवतांच्या प्रतिमा असतील तर त्या कोणत्या दिशेला असाव्यात अशा अनेक गोष्टींबाबत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

दरम्यान वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या तुमच्या घरात असणं अशुभ मानलं जातं, जर तुमच्याही घरात या वस्तू असतील तर त्या वस्तू घराच्या बाहेर काढा असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्रात नेमकं काय म्हटलं आहे? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

जुने कपडे – वास्तुशास्त्रानुसार घरात जुने आणि फाटलेले कपडे असता कामा नये, यामुळे तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये बाधा येऊ शकते.

जुनं भंगार सामान – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जुनं आणि भंगार सामान ठेवू नका, ते एक नकारात्मक ऊर्जेच प्रतिक आहे, यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

कचरा –  जर तुमच्याही घरात वारंवार कचरा साचून राहात असेल तर हे अशुभ मानलं जातं, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.

खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू –  जर तुमच्याही घरात खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्याला घरात ठेवता कामा नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

बंद घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ हे वाईट वेळेचं प्रतिक असतं, त्यामुळे घरात असं बंद घड्याळ ठेवू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं? भाजप नेता म्हणाला, महायुतीत सगळं...
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव; विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा उल्लेख करत राऊतांनी अखेर सगळंच सांगितलं
सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार
Gold -Silver Rate | सोन्याने मोडले सर्व विक्रम! 10 ग्रॅमचा भाव 1.55 लाखांच्या पार, तर चांदीचा भाव काय?
रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर..
Rohit Pawar Protest | रोहित पवारांचं उपोषण अखेर स्थगित! मात्र मागण्या मान्य नाही झाल्या तर 4 जुलैला पुन्हा रणशिंग
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?