AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील

घरात पूजा स्थळाला सर्वात पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात पूजा-पठन करण्याला (Vastu Tips For Wealth) विशेष महत्व आहे. त्यासोबतच पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टीांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

Vastu Tips | पूजा स्थानावर 'या' वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील
Vastu Tips
| Updated on: Apr 08, 2021 | 10:24 AM
Share

मुंबई : घरात पूजा स्थळाला सर्वात पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात पूजा-पठन करण्याला (Vastu Tips For Wealth) विशेष महत्व आहे. त्यासोबतच पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टीांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. मान्यता आहे की या वस्तूंना पूजा घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. त्याशिवाय सुख- समद्धी आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात (Vastu Tips For Wealth Keep These Things At Puja Sthal In House).

पूजा घरात या गोष्टींना ठेवल्याने सुख-समृद्धी आणि धन वृद्धी होते. सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहातो. चला जाणून घेऊ वास्तू शास्त्रानुसार कुठल्या गोष्टी पूजा घरात ठेवणे शुभ असते.

शंख

पूजा घरात शंख ठेवणे अत्यधिक शुभ असते. समुद्र मंथनावेळी देवी लक्ष्मीसोबत शंख ही निघाला होता. पूजेनंतर शंखनाद करणे चांगलं असते. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि धन राहातं.

शाळीग्राम

शाळीग्राम भगवान विष्णूचे रुप आहे. त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी राहाते.

घंटी

घंटीच्या आवाजात सकारात्मक उर्जा असते. मान्यता आहे की ज्या घरांमध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहाते आणि निगेटिव्ह शक्ती दूर राहातात. पूजा-अर्चना करताना घंटी वाजवणे चांगले असते.

मोरपंख

अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात. वास्तू शास्त्रानुसार, याला शुभ मानलं जातं. भगवान श्री कृष्णही मुकुटावर मोरपंख लावतात. मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते. त्याशिवाय, यामुळे घरात सुख-शांती राहाते.

गंगाजल

कुठल्याही देवी-देवतांची पूजा असेल किंवा कुठलं अनुष्ठान असेल. त्यामध्ये गंगाजलचं विशेष महत्त्व असते. गंगाजलला पितळ आणि चांदीच्या पात्रात भरुन ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात. यामुळे घरातील संपत्तीत वाढ होते.

कलश

पूजेदरम्यान घरात कलश ठेवला जातो. यामुळे घरात सुख-समृद्धी राहाते. कलश भगवान गणेशाला अतिप्रिय आहे. व्यस्त जीवनामुळे रोज कलश स्थापन करणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर स्नान करुन तांब्याच्या पात्रात जल भरुन त्यामध्ये आचमनी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला. कलशाच्या पाण्याला झाडात प्रवाहित करा.

Vastu Tips For Wealth Keep These Things At Puja Sthal In House

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या चार राशीचे लोक असतात भाग्यवान, कमी वयात गाठतात यशाची शिखरं, बक्कळ पैसाही कमावतात

बुधवारी ‘अशी’ करा गणेशाची पूजा, कधीही येणार नाही आर्थिक अडचण

Zodiac Signs | या चार राशींना आवडतं वर्चस्व गाजवायला, तुमची राशी तर नाही ना यात?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.