AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : सासू सुनेचं पटत नाही? नवरा बायकोचे भांडणं होतात? मग घरात हे खास झाड लावाच

जर तुमच्याही घरात सतत भांडणं होत असतील, छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत असतील तर वास्तुशास्त्रात त्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Vastu Tips : सासू सुनेचं पटत नाही? नवरा बायकोचे भांडणं होतात? मग घरात हे खास झाड लावाच
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 5:45 PM
Share

तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल, की बऱ्याचवेळेला काही कारण नसताना घरात भांडणं होतात, वादविवाद होतात. त्यामुळे घर अशांत राहातं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील व्यक्तींची आपसात भांडणं होतातं. या सर्वांमुळे घरातील वातावरण बिघडतं. जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण शांत ठेवायचं असेल, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण टाळायची असतील तर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत, त्यापैकीच एका उपयाची आज आपण माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, ती जर तुम्ही तुमच्या घरात लावली तर त्यांच्या प्रभावामुळे तुमच्या घरात वातावरण शांत राहातं, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्यातील एका झाडाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

जर तुमच्याही घरात सतत भांडणं होत असतील, घरात शांतता टिकत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचं झाड लावू शकता. मात्र फक्त मोगऱ्याचं झाड लावून काम होतं असं नाही, तर तुम्ही मोगऱ्याचं झाडं तुमच्या घरात ज्या दिशेला ठेवणार असाल ती दिशा देखील योग्य पाहिजे, तसेच मोगऱ्याच्या झाडाची काळजी देखील योग्य पद्धतीनं घेतली गेली पाहिजे.

मोगरा हे एक असं झाडं आहे, ज्याच्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो, मोगऱ्याच्या फुलांपासून जो सुगंध येतो तो घरातील नकात्माकता दूर करतो, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरातील वातावरण प्रसन्न राहातं. ज्योतिषशास्त्रामध्ये मोगऱ्याला सौभाग्याचं प्रतिक मानलं गेलं आहे. मोगरा घरामध्ये ऊर्जा संतुलनाचं काम करतो.

मोगऱ्याचा संबंध हा शुक्र ग्रह आणि चंद्रशी आहे, असं मानलं जातं. शुक्र हा ग्रह प्रेम, आकर्षण आणि ऐश्वर्याचं प्रतिक आहे, तर दुसरीकडे चंद्र शांतीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे घरामध्ये मोगऱ्याचं झाडं लावणं शुभ मानलं जातं. मोगऱ्यामुळे घरात शांती टिकते आणि भांडणं होत नाहीत असं मानलं जातं. मोगऱ्याचं हे झाडं घरातील उत्तर -पश्चिम दिशाला लावणं शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.