AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी गुपचूप तिजोरीमध्ये ठेवा फक्त ही एक गोष्ट, घर पैशांनी भरून जाईल

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो, या काळात काही सोपे उपाय केल्यास भाग्य तुमची साथ देतं, तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक अडी अडचणी दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी गुपचूप तिजोरीमध्ये ठेवा फक्त ही एक गोष्ट, घर पैशांनी भरून जाईल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2025 | 6:59 PM
Share

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो, या सणाला दीपोत्सव असं देखील म्हटलं जातं. दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी घरात सर्वत्र दिवे लावले जातात, घर दिव्यांनी उजळून निघतं, माता लक्ष्मी, गणेश आणि धनाचे देवता कुबेर यांची या दिवशी पूजा केली जाते. दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्यानं दिवाळीची तयारी काही आठवडे आधीच सुरू होते, या काळात सर्व घराची साफ-सफाई केली जाते, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय आहेत, जे दिवाळीच्या दिवशी केल्यास घरात सुख, समुद्धी येते, पैशांचा कधीही तुटवडा जाणवत नाही. आज आपण अशाच काही उपायांबाबत जाणून घेणार आहेत.

दिवाळीच्या दिवशी काही खास गोष्टी या तिजोरीत ठेवा, एक रुपयाच्या नाण्यासोबत सुपारी आणि गुलाबाच्या काही पाकळ्या एका कपड्यात बांधा, शक्यतो हा कपडा लाल पाहिजे, त्यामध्ये एक रुपयाच्या नाण्यासोबत सुपारी आणि गुलाबाच्या काही पाकळ्या बांधा, हे सर्व साहित्य आधी माता लक्ष्मीच्या फोटो जवळ ठेवा, त्याची पूजा करा, त्यानंतर या सर्व गोष्टी तुमच्या पैशांच्या तिजोरीत ठेवा, सोबतच जर तुम्ही तुमच्या कपाटात चांदीचा शिक्का जर ठेवला, तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तु्मच्यावर राहते.

तुमच्यावर कर्ज झालं आहे, खूप प्रयत्न करून देखील कर्ज कमी होत नाहीये, तर यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता, दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरातील तिजोरीत नोटांचं एक बंड ठेवा, या नोटांच्या बंडलामध्ये दहाच्या नोटेपासून 500 च्या नोटेपर्यंत कोणत्याही नोटा असतील तरी चालतील.दिवाळीच्या दिवशी हा उपाय केल्यास हळू हळू तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते, तुमचं कर्ज फिटतं. सोबतच माता लक्ष्मीला कवडी देखील अर्पण केली जाते, पूजा झाल्यानंतर ही कवडी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.